अनुवादकांच्या एका सुंदर संमेलनात प्रकाशक म्हणून सहभागी होण्याची संधी मला नुकतीच मिळाली. त्या संमेलनाचा वृत्तान्त पुढे देत आहे. ज्या मंडळींना या क्षेत्रात काही काम करण्याची इच्छा असेल, त्यांना - कदाचित - काही उपयोग होऊ शकेल.
~
*नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाविषयी!*
रात्र चांगलीच पडलेली होती. बंगल्याच्या आसपास नेहमी असते तशीच भयाण शांतात होती, बंगल्यातील आरडाओरडा आणि भयानक किंकाळ्याचे आवाज आता बंद पडलेले असले तरी एक प्रकारची विचित्र शांतता अजूनही तिथे होती. बंगल्याच्या आतल्या भागात एका मोठ्या हॉलवजा खोलीमध्ये एका खुर्चीच्या मागे रॉबिन लपून बसलेला होता. शेजारच्याच खोलीत इ. इनामदार देखील लपलेले होते. अंधाऱ्या रात्री कोणी गुपचूप बंगल्यात प्रवेश केलाच तर त्याला बेसावध गाठून पकडण्याचा इरादा केला गेला होता.
सकाळ झाल्या झाल्या हरिभाऊंनी पोलिसांना कळवलं कि दोन चोर रात्री बंगल्यात गुपचूप शिरून आरडाओरडा करून लोकांना घाबरवण्याचे चाळे करताना पकडले गेलेत. त्यानुसार सकाळीच पोलिसांनी आपल्या गाडीतून रंगा आणि बाळू या दोन्ही चोरांना पकडून नेले. तरीही ते दोघे पकडले गेले आहेत याची गुप्तता बाळगण्याबद्दल रॉबिनने पोलिसांना सूचित केले होते.
गावातीलच एका छोट्याश्या हॉटेलमध्ये मिसळ खात रॉबिन बसला होता. हॉटेलमध्ये इतर कोणीही गिऱ्हाईक न्हवते. शेंडेंच्या बंगल्यातील होणाऱ्या भुताटकीच्या घटनांमागे नक्की कोण असावे असा विचार करत तो बसला होता. गावात नीट व्यवस्थित चौकशी करावी असा त्याचा विचार होता. भूतबंगल्यावर जाऊन पाळत ठेवणे देखील गरजेचे होते. हरिभाऊ आपली घरातली कामे उरकून नंतर इथेच येणार होते.
१९४२ ची चळवळ आणि साळवे गावचा स्वातंत्र्य संग्राम
लेखक : अविनाश अरुण कोल्हे.
मित्रानो
साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे
ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता
फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले
परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात
आतापर्यंत मराठी विश्वात तरी एखाद्या साहित्य चोराला चोरी खाली अटक किंवा जेल झाल्याचे ऐकिवात नाही
२ वर्ष आधी एका कविता चोरी प्रकरणी पोलीस कम्प्लिन्ट ची कॉपी वायरल होत होती तोच सर्वात मोठा पराक्रम
सूर्य आता चांगलाच वर आला होता आणि तापू लागलेला होता. शेंडेंच्या घरातून बाहेर पडल्यावर रॉबिन आणि हरिभाऊ रस्त्यावरून चालू लागले. शेंडेंच्या घरापासून ते पुढे चालत आले असता त्यांना शेजारच्या घरातून हरिभाऊंना कोणीतरी आवाज दिला.
“ काय हरिभाऊ, दुपारच्या वेळी उन्हातान्हात कुठे हिंडताय, आणी सोबत हे महाभाग कोण ?”
या प्रश्नाकर्त्याकडे माना वळवून दोघेही बघू लागले. एक स्थूल शरीरयष्टीचा माणूस अंगात बनियन आणि लुंगी घालून शेजारच्या घराच्या कुंपणामागे उभा राहून मिश्किलपणे त्यांच्याकडे पाहत होता.
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
बाहेर टीव्हीच्या कुठल्यातरी चॅनेलवर गाणं सुरू होतं.
दांडीचं भांडं
तसा माझा स्वयंपाक घराशी संबंध अधूनमधून येत असतोच, पण बहुतेक वेळा तो "चहा" नामक कॅटेगरी पर्यंतच मर्यादित राहतो. तसा मला स्वयंपाक येतोच (हो! खरंच! कसली शंका?), पण बायको माझ्यावर तशी वेळ येऊ देत नाही. याबद्दल तिचे आभारच मानायला हवेत—स्वयंपाकात प्रयोग करून घर उद्ध्वस्त करण्याचा माझा स्वभाव ती ओळखून आहे बहुतेक.
आता, प्रत्येक घरात एक असं खास भांडं असतं, जे फक्त चहासाठीच वापरलं जातं. बाकी काही त्यात शिजवलं तर स्वयंपाकघरात थेट आणीबाणी लागू शकते. आमच्याकडेही असं एक खास, आदरस्थानी असलेलं चहाचं भांडं आहे—"दांडीचं भांडं"!
श्रावणाच्या पहिल्या पावसात ओल्या झालेल्या वाऱ्यासारखी, आमच्या गावातही एक ताजेपणाची लाट यायची. हा महिना सुरू झाला की श्रावणी सोमवारची अर्ध्या दिवसाची सुट्टी आमच्या पायांना सायकलच्या पेडल्सवर ठेवायला भाग पाडायची. सकाळी शिक्षकांचा शेवटचा शब्द संपताच, आम्हा चार-पाच मित्रांचा गट आपापल्या सायकली उचलून पद्मालयच्या रस्त्याने मस्तीत निघालेला असे. एरंडोलपासून जवळपास दहा किलोमीटरवर वसलेल्या या प्राचीन मंदिरापर्यंतचा प्रवास केवळ अंतर नव्हते, तर आमच्यासाठी त्या काळातला एक रोचक अनुभव होता.