मायबोली गणेशोत्सवाच्या धूमधामीतही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कारणही तसंच होतं. १०० आकडा तिच्या नकळत गाठलाच होता. त्याच विचारात तिने संयोजकांच्या धाग्यावर नो मैदा, नो शुगरचा संकल्प लिहून टाकला. ‘त्या निमित्ताने शंभरातले काही तरी कमी होतील’’ तिने विचार केला.
——
नीट चाललेल्या संकल्पाला ग्रहण लावण्यासाठीच की काय आज नवऱ्याने तिच्या आवडीच्या करंज्या आणल्या. ‘प्रसाद म्हणून खाव्याच लागणार’ असा विचार करत पाच सहा करंज्या ताटलीत घेत ती मायबोली चाळू लागली.
इथे आल्यापासून मायलेकांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.घरून शिदोरी बांधून घेऊन येता आली नव्हती.
सर्वत्र रंगीत वातावरण.सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्न भाव.पण कोणाच्या घरी आवर्जून जाऊन हात पसरणं फार भीतीदायक. अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये.अगदी ओसरीपर्यंत भुकेने नेलंही होतं.पण आतलं दृश्य पाहून परत फिरावं लागलं होतं.शिवाय बाहेर अखंड कोसळता पाऊस.
ते अंत्यविधी नंतरच्या आठवड्याचे दिवस होते. तिने आपल्या मेहनती शाखा व्यवस्थापक पतीचा अंत्यविधी गेल्या आठवड्यातच आटोपला होता ,तिचा प्रिय पती,ज्याने दिवस रात्र कष्ट करून साध्या लिपिकापासून बँकेच्या व्यवस्थापकापर्यंतची प्रगती केली होती, आपल्या दोन मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते,परदेशात नोकरीला पाठवले होते आणि तिला एक संपूर्ण व सुखी जीवन दिले होते.
दहा वर्षांनी कॉलेजमेट्सच्या रियुनियनचा योग आला. पावसाळ्यात करायचे ठरले.
वर्षाविहार रियुनियन!
सारे आले होते. "ते दोघे" वगळून! पाऊसही तसाच धुंद होता. दहा वर्षांपूर्वी असायचा तसाच. आणि आम्ही सारेच रेनडान्स करत होतो. दहा वर्षांपूर्वी करायचो तसेच. पण माझ्या मनात प्रश्न येत होते. ते दोघे का आले नसावेत? कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमप्रकरण किती गाजलेले. आता कुठे असतील? काय झाले असेल?
आणि अचानक माझे लक्ष गेले. ते दोघे सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. "अरे तुम्ही दोघे कधी आलात?", असे विचारत मी त्यांच्याकडे निरखून पाहीले. एकमेकांसोबत डान्स करत होते खरे.
पुन्हा एक सकाळ. पुन्हा एक दिवस. तो यंत्रवत ऑफिसच्या दिशेने जाऊ लागला.
"किती दिवस असे रटाळवाणे जगायचे? काहीतरी वेगळे करायला हवे. रिस्क घ्यायला हवी" त्याच्या मनात पुन्हा तेच सारे विचार.
आणि एके ठिकाणी कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्याने गाडी सरळ ऑफिसकडे न नेता डावीकडे एका डोंगरवाटेला दामटली. तसेही आजवर त्याला नेहमीच त्या वाटेने डोंगरमाथ्यावर जायची तीव्र इच्छा व्हायची. आज त्या इच्छेने उचल खाल्ली.
माझे स्थित्यंतर- आपुलाची संवाद आपणासी..
प्रिय,
बघ, तुझ्या करता मी ‘प्रिय’ लिहिलं, अन् मायन्यालाच अडखळले. हल्ली कुठल्याही पत्रात ‘प्रिय’ शब्द लिहिल्या जातो, तो निव्वळ सवयीने.
१. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याजवळचं, 'भावार्थ.. पुस्तकं आणि बरंच काही' नावाचं दुकान. कलेक्शन आणि विषयांची, लेखकांची रेंज चांगलीय. एकाच शेल्फच्या एका कप्प्यात सेम पुस्तकाच्या थप्प्याच्या थप्प्या रचलेल्या दिसत नाहीत. काही दुकानांमध्ये एकेका लेखकाला/लेखिकेला एकेक कप्पा ॲलॉट केलेला दिसतो. इथं तसं नाही. दोन विरूद्ध टोकाचे लेखकही इंटरेस्टिंगली शेजारी शेजारी दिसू शकतात. दरवाजा ढकलून आत गेल्यावर बाहेरची दुनिया कटऑफ. समोर सदोदित वाहणारं ट्रॅफिक आहे, पण आत किंचितही आवाज जाणवत नाही. खिडक्यांच्या काचांतून झिरपत आत येऊन शालीनपणे पसरणारा नैसर्गिक उजेड.
पान्हा
माईने आज पुरणाचा घाट घातला होता. त्याकरिता तिची लगबग चालू होती. तिने जुनीशी होत असलेली रेशमी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा करुन तीत बागेतल्या फुलांचा सुनेने सकाळी केलेला गजरा माळला होता. छोट्याश्या चौकोनी स्वयंपाकघरातही तिची इकडून तिकडे धावाधाव सुरु होती. तिच्या रेशमी साडीचा दोर कोपऱ्यातील कपाटात नकळत अडकला अन पळभरासाठीची तिची गती थांबली. तिने अलगदपणे अडकलेले सुत बाजूला केले. पुन्हा स्वयंपाकसृष्टीत प्रवेश करती झाली.
फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता.
“साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले.
माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता.
“लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून? माझ्या कडून म्हणाल तर मी कुणाशीही उधार उसनवारी करत नाही. कुणाकडून घेत नाही कुणाला देत नाही. बँकेकडून पाहिजे असेल तर चार नंबरच्या मोने बाई आहेत, त्यांना भेटा. मला माझे काम करू द्या.”
“सर मोने बाईंनीच मला आपल्याकडे पाठवलं आहे.”
त्याने टेबलावरच्या इंटरनकॉमची बटणे दाबली.