आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...
हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'
'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !
आज मी खूप आनंदात आहे. का सांगू ?
आज ती भेटायला आली तेच आवडणा-या हिरव्या ड्रेस मधे.
आणि कहर म्हणजे..स्वतः केलेला शिरा घेऊन आली.
शि-याचा एक घास तयार केला आणि चक्क मला भरवायला पुढे केला.
माझ्यासाठी ते इतके अचानक होते की सर्वदूर आतल्या पेशी पेशींमधे काटा उभा रहीला...
त्याच निमित्ताने... तिच्या मऊ बोटांचा ओठांना झालेला स्पर्श
कसे सांगू ... शब्दच नाहीयेत बघ
अरे वेड्या, आपणच नव्हतो भेटलो का? मलाच काय सांगतोयस?
"सर, त्रिमुर्ती क्लाएंटच्या नारायण मूर्तीकडून पुन्हा रिक्वेस्ट आली आहे. अजूनही गेम रटाळ वाटतोय. इतर दोन डायरेक्टर्सचंही तेच म्हणणं आहे. तो भैरव नंदी वैतागून प्रोजेक्टच रद्द करत होता. ब्रह्मेंनी त्याला थोपवलं म्हणे."
"अरेच्चा! अजूनही समाधान नाही मूर्तीचं? त्याच्यासारखं आम्हीही अहोरात्र काम करायचं काय! बरं आता ते खास सहा डार्क भावना-प्रोग्रॅम्स आहेत ते फिट करा गेममधल्या सर्व पात्रांत. अर्थात प्रत्येकात वेगवेगळं प्रमाण हवं. घ्या किती रंजक हवंय ते! आता बोंबलले तरीही हे प्रोग्रॅम्स काढता येणार नाहीत सांगा."
"आणि गेम हाताबाहेर गेला तर?????? "
“बाबा हे काय करता?” नेहमीच्या बालसुलभ कुतुहलाने तिने विचारले.
“अगं घाणेरडे झालेले भाग काढून टाकतोय
आपण जो माल विकतो
तो घाण असेल तर लोकं घेणार नाहीत ना”
हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले तोंड वावच्या अभिनिवेषात उघडेच होते काही वेळ
काहीतरी विलक्षण शोध लागलाय असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
ती तिच्या झपाटलेल्या अवस्थेत जाता जाता बोलून गेली,
“एक सॉलिड आयडिया आली यावरून बाबा
मी आजच मिनी ला सांगते शाळेत
की नेहमीप्रमाणे कुणी घरात नसताना तुझे मोठे काका आले
की तोंडात माती कोंबत जा
आणि चड्डीत सू करून टाकत जा
“अगं तू सुयश ला घ्यायला लवकरच येशील का, अगं काही नाही कुणाशी बोलतच नाहीये तो?” असा फोन आला आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मित्राच्या वाढदिवसासाठी दोन तास तरी लागतील म्हणून त्यानंतर घ्यायला जायचे ठरले होते.
आपल्याला बाबा नाही याबद्दल तो कधीही उघड बोललेला नव्हता. तिनेही कधी बाबाची उणीव भासू नये म्हणून कोणतीच कसर राहू दिली नव्हती. पाचवीतच होता कोवळेच वय त्याचे.
मत्सर मैत्रीतही काय घडवेल सांगता येत नाही. बाबा नसण्यावरून तर चिडवले नसेल?
त्याचे डबडबलेले डोळे पाहून तिच्या मनात अनुकंपा झरू लागली.
ग्राऊंड च्या कडेला एकटाच शिक्षा म्हणून तो उभा होता.
“आधीच वेळ दिलेली होती आणि गटातले सगळे खेळाच्या सरावासाठी बरोबर आले, तू वेळेवर का आला नाहीस?”, कर्कश्य आवाजात ओरडत सरांचा तिसऱ्यांदा विचारलेला प्रश्न, तरी तो गप्पच होता.
“तुझ्या बाबांना फोन केला तेव्हा तू वेळेवर निघाला हे त्यांनी सांगितले, अरे मग तरीही उशीर कसा झाला? कुठे घालवलास हा वेळ?”, सरांचा थयथयाट शब्दात मावत नसल्याने डोळ्यांवाटे पण प्रकटत होता.
खोटे त्याला बोलायचे नव्हते, जे घडले त्या आनंदासमोर ही शिक्षा काहीच नव्हती.
तो पठ्ठा गप्पच होता.
दोन दिवसांनी पेपर आहे.
आजचा सुटीचा दिवस निट अभ्यास करण्यात घालवायचा,
तिने मनात ठरवले होते.
“आज तरी अभ्यास करणार आहेस का?”, या आईच्या वाक्याने दिवसाची सुरवात झाली.
तिने काय ठरवले आहे न विचारता, ती काय करणार आहे हे गृहित धरून असलेले आईचे वाक्य ऐकताच तिचे डोके सटकले.
अभ्यास करण्याची कोणतीच कृती करायची इच्छा किंवा विचाराला तिच्या डोक्यात आता जागाच उरलेली नव्हती.
सगळी जागा रागाने भरलेली.
मी बिछान्याला खिळून होतो. तिन वर्षाचा भाचा, सकाळपासून अनेकदा बिछान्याजवळ येऊन गेलेला होता. आपल्याबरोबर रोज खेळणारा मामा, आज असा काय करतोय हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर होता.
न राहवून तो म्हणालाच, ‘तू माझ्याशी का खेळत नाहीस? दिवसा झोपायचं नसतं नं?’,
जवळच उभी आई त्याला समजावून सांगू लागली,
‘मामाला बरं नाही. त्याचे हात पाय दुखताहेत, तो औषध खाऊन झोपला आहे, काही दिवसांनी बरा होईल.’
त्यानंतर अनेकदा तो येऊन गेला. त्याच्या चेहऱ्यावरची गहन चिंता त्याला शब्दात व्यक्त करता येत नसावी. शेवटी त्याने मला हात लावून हलवले. हातात त्याची प्राणप्रिय कार होती.
वेदांत! श्रीमंत घरात वाढलेला एकुलता एक वारस.
आज त्याचा सतरावा वाढदिवस होता.
सकाळीच त्याने बाबांना सांगून ठेवले होते, की तो संध्याकाळी मित्रांना पार्टी देणार आहे; आणि त्यासाठी परवाच नवीन आणलेली पोर्शे कार हवी आहे.
नाही ऐकायची त्याला सवय नव्हतीच. उर्मट-अरेरावीनेच योग्यता सिद्ध होते असे त्याचे मत होते.
बार, तिथला झगमगाट, मद्याचे प्याले, अगदी हवा तसा माहोल बनला होता.
परत निघायलाच एक वाजला. ड्रायव्हरकडून वेदांतने चाव्या हिसकावून घेतल्या. मला चालवायचीच आहे ही नवीन पोर्शे. तू बस मागे!
साक्षात समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक - पारिजात वृक्ष. साहजिकच इंद्राने तो त्याच्या बागेत लावला. पुढे नारदमुनींनी त्याचे रसभरीत वर्णन केल्यावर रुक्मिणीला त्या फुलांचा मोह झाला. त्यावर कृष्णाने तिला ती फुले आणून दिली परंतु सवतीमत्सराने सत्यभामेला देखील त्या फुलांचा मोह झाला. मग सत्यभामेने "हा स्वर्गीय वृक्ष मला माझ्या बागेत हवाच" असा हट्ट धरला. आता झाली का पंचाईत? मोठा कठीण प्रश्न. शेवटी स्त्रीहट्टच तो, पण कृष्णाने एक युक्ती केली. पारिजातकाचे झाड त्याने सत्यभामेच्या अंगणात असे लावले की त्याच्या फांद्या रुक्मिणीच्या अंगणात वाकत होत्या. सडा पडायचा तो रुक्मिणीच्या अंगणात.