मभागौदि २०२५ शशक - प्रश्न - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 27 February, 2025 - 05:28

आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...

हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'

'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !

'दादा, बंद डोळ्यांआडून दिसणारं ब्रह्मांडात भरलेलं तुझं हे अस्तित्व.. तरीही आमच्या तिघांचं पोट रिकामं..? असं का बरं ? आणि तुझं ?... ते भरलंय वा रिकामं आहे मला का बरं नाही कळत ?'
पुन्हा मंद हसला...
मंदबुद्धी ! मनात म्हटलोसुद्धा..

पोटातील भुकेनं पुन्हा डोकं काढलंच.. चरफडलो..
दणाणा पावलांनी आत जाऊन ताटी लावता झालो.

२७.०२.२५

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच.
खालची तारीख जुनी टाकली असती तर अजून मजा आली असती..

मस्त!

झकासराव, निरुदा, देवकीताई, जाई, एस, मानवदा, सियोना, असामी, हर्पा, अस्मिताई, मृ प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद Happy

खालची तारीख जुनी टाकली असती तर अजून मजा आली असती..>>> जमलं असतं. Happy

निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव दोघांचे नाते असेच होते.>>> Happy
खरंतर लहान तोंडी मोठा घास.. ज्याचे शब्द अजरामर झाले त्याच्या मनीची व्यथा मांडताना मी तोकडा पडणार हे माहिती असूनही हा प्रसंग ताटीच्या अभंगांआधीचा म्हणून ही चूक करुन बघितली. Proud

छान जमली आहे!

ताटी शब्द वाचून सुद्धा आधी समजली नव्हती. प्रतिक्रियांतून समजली. मात्र ही लेखनाची मर्यादा नाही. एकदा तो क्लू लागला की कथा जमली आहे हे लक्षात येते.

ऋतुराज, ऋन्मेष, माझेमन, सामी, मामी, rmd, फारएण्ड, छल्ला, नताशा, धनुडी, आबा प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार Happy

मात्र ही लेखनाची मर्यादा नाही. एकदा तो क्लू लागला की कथा जमली आहे हे लक्षात येते.>>> Happy

मंदबुद्धी शब्द कथेच्या संदर्भात खूपच खटकला!!>>>
मलासुद्धा ! यासोबत आळशी हा शब्दही Happy

मंदबुद्धी शब्द कथेच्या संदर्भात खूपच खटकला!!>>>
मलासुद्धा ! यासोबत आळशी हा शब्दही
>>>

मग का वापरलेत ते शब्द

मग का वापरलेत ते शब्द>>>
१) या शब्दांतून दोघा भावंडातील खेळकर संबंध दर्शवायचे होते.

२) समाजाकडून होणारी अवहेलना, आईबाबांचं अचानक अकाली जाणं, पोटातील भूक (मुक्तीकडनं 'चणे खावे लोखंडाचे' हे शब्द भुकेसंदर्भानेही आले असतील का हा विचार मनात आला.) आणि ज्याच्याकडनं (मोठा भाऊ -गुरु) आधाराचे शब्द मिळावेत त्यानं 'वेळ काढण्यासाठी' पत्करलेलं मौन, बाळगलेला संयम, सोबत जाणिवपूर्वक केलेला हठयोगसाधनेचा उपदेश - तिकडे भावंडांना वळविण्यासाठीचा प्रयत्न, दरम्यान मनाला पडणारे असंख्य प्रश्न आणि अखेरीस या सगळ्यातून निर्माण होणारी चीडचीड, राग व्यक्त करण्यासाठी वरील दोन्ही शब्दांचा आधार घ्यावा लागला.

निवृत्तीनाथांनी त्यावेळी संयम, मौन बाळगलं असेल असं समजण्याचं कारण म्हणजे वयानं लहान असलेल्या मुक्तीला पुढे यावं लागलं आणि त्यातनं ताटीचे अभंग आले.

आणखी एक म्हणजे शंभर शब्दांच्या मर्यादेमध्ये सहजावस्थेत तपसाधन करणारा शिव आणि पालनपोषणाची जबाबदारी वाहणारा विष्णू या दोघांमधील द्वैत-अद्वैत दाखवायचं होतं. Lol

पुढे चालून ताटी शब्द ठेवूनही नामोल्लेख टाळून हे लिहिणं या महान व्यक्तीरेखांविषयी नाहीये असं म्हणायला जागा ठेवलीय कारण माबोच्या बाहेरील (असमंजस) लोकं हे असं लिहिणाऱ्याची चपलेनं आरती उतरवतील अशी सध्याच्या काळातील स्थिती आहे. Proud

प्रतिसादाबद्दल धन्यवाद हर्पेनदा Happy