योगायोग
योगायोग
योगायोग
सकाळची वेळ. Mr. वर्मा, ऑफिसला निघण्याच्या तयारीत होते. का कोण जाणे, ते जरासे गंभीर दिसत होते.तोच त्यांच्या फोनची रिंग वाजते.
पलिकडून घोगऱ्या, जरबेच्या आवाजात शब्द येतात -
"तुमची मुलगी सोनालीला, आम्ही किडनॅप केलंय. ती सुरक्षित हवी असेल, तर दोन दिवसांत ५ कोटी रुपये तयार ठेवा. आणि पोलिसांना काही कळलं, तर तुमची मुलगी कधीच घरी येणार नाही. लक्षात ठेवा!"
"अरे देवा!" Mrs. वर्मा भीतीने किंचाळल्या.
Mr. वर्मांनी आवाज स्थिर ठेवत विचारलं. "मी विश्वास कसा ठेवू, की ती तुमच्याच ताब्यात आहे?"
शर्यत
-------------------------------------------------------------------------------------
‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला.
तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते.
संध्याकाळची वेळ. शाळा सुटलेली . पोरं घोळक्याने घरी चाललेली . त्यावेळची ही चर्चा. आकाश आणि राकेश दोघे एकाच वर्गात होते .आठवी तुकडी क मध्ये.
त्यांचं गाव मध्यम आकारात पसरलेलं होतं. हिरवं, निसर्गसंपन्न आणि शेत जमिनींचं. कडेगाव त्याचं नाव .त्या गावाला बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा होती.
सखारामने सायकलवर टांग मारली आणि रोजच्यासारखाच तो पत्र वाटपाला निघाला.
मोशीसारख्या लाल मातीच्या गावात, जिथे शेती आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर लोकांचे पोटपाणी चालत असे, सखाराम तिथला एकमेव पोस्टमन होता. साधा, कष्टाळू आणि प्रामाणिक. वय पंचावन्न च्या आसपास, उन्हाने रापलेला चेहरा पण डोळ्यात आनंदाची चमक असणारा, सगळ्यांचा विश्वासू सखाराम.
अश्रूंची झाली फुले
लोंबकळणाऱ्या मंगळसूत्राशी मृदुला खेळत बसली होती. गेल्याच आठवड्यात ती हरिहरेश्वरला सहलीला गेली होती. निसर्गाचे रौद्र स्वरूप पाहून तिला भीती वाटत होती. असंख्य प्रेमी जीवांनी जीवनाचे स्वप्न बघितलेल्या या भरतीच्या लाटा, पण याच भरतीच्या लाटा पाण्याने कातळ फोडू शकतात हे तिने प्रथमच पहिले. जीवन असलेला समुद्र जेव्हा हजारो मासे भरती बरोबर बाहेर टाकून देतो, त्यावेळेस त्यांचा आधार नाहीसा होऊन हजारो मासे काठावर मृत्युमुखी पडलेली तिने गेल्या आठवड्यातच पहिली.
हल्ली ए आयचं आणि त्यातल्या त्यात चॅट जीपीटीचं फॅड भलतंच वाढत चालललं आहे. कोडींग, मैत्री, शिक्षण, चित्रकारी कोणतंही क्षेत्र या बाबाने सोडलेलं नाही. पण "भविष्यात हे चॅट जीपीटी किंवा तत्सम कोणतंही ए आय टूल लेखन क्षेत्रातसुद्धा घुसखोरी करून आपणा लेखकांच्या पोटावर पाय आणू शकेल काय?" अशी बसल्याबसल्या उगाचच धास्ती वाटली. शेवटी या बोचऱ्या शंकेचा सोक्षमोक्ष लावायचा म्हणून एक चाचणी घ्यायची असा बेत मनात आखला आणि एक अर्धवट लेख लिहून चॅट जीपीटीला तो पूर्ण करायला सांगितला. सदरच्या रामायणानंतर या चाचणीचा आऊटपुट इथे शेअर करून माझ्या शंकेचा अंतिम निकाल मी मायबोलीवरील समस्त महारथी लेखकांवर सोपवत आहे.
नसलेल्या मुलीची गोष्ट
“एकटी एकटी घाबरलीस ना?
वाटलंच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही…”
एफएमवर गाणं सुरू होतं. बाहेर एप्रिलचा उन्हाळा भरात होता, तरी एसीच्या हवेत उकाडा निलमपर्यंत पोहोचत नव्हता. गाणं संपेपर्यंत ती डेंटिस्टच्या क्लिनिकजवळ पोहोचली. तिने गाडी पार्क केली आणि घड्याळात पाहिलं- अपॉईंटमेंटला अजून चाळीस मिनिटं होती.
“दातात फिलिंग झालं की भूल उतरेपर्यंत काही खायचं नाही, त्यामुळे त्याआधी मस्त खाऊन या”, नेहमीच्या खेळकरपणाने डॉक्टरांनी तिला मागच्या अपॉईंटमेंटमध्ये सांगितलं होतं. नेमकं आजच सकाळपासून कामाच्या धावपळीत, निलमला दोन घास खायला देखील वेळ मिळाला नव्हता.
वाटते जगावे मला पुन्हा एकदा नव्याने
उशाशी ठेवला गे फोटो तुझ्या विचाराने
तोडून सारी बंधने तू चाल माझ्या सवे
दिला संकेत केव्हांच मला श्रीविठ्ठलाने
विचारते सवाल जिंदगी नि दुनिया मला
मिळेल उत्तरही दोघांना तुझ्या असण्याने
या कुशीत त्या कुशीवर रे ती झोपमोड
पुन्हा एक रात्र रेंगाळली तुझ्या नसण्याने
होईल संसार आपलाही रामजानकीचा
ठेवली हातावर चतकोर वेड्या नशिबाने
ही दुभंगलेली नाती अन् तुझी आठवणं
एकटा पुसतो कैकदा आसवे रूमालाने