लेखन

मनातली मूगडाळ

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

धरून चालूया की तुम्ही ३५ किंवा ४० वर्षांचं आयुष्य जगलेले आहात. या प्रवासात असे असंख्य प्रसंग आले असतील, जिथे तुम्ही “जाऊ दे”, “आपलीच माणसं आहेत”, “दुर्लक्ष करू” अशा विविध कारणांच्या आड अनेक अप्रिय अनुभव गिळून टाकले असतील जणू कित्येक किलो मूग गिळल्यासारखे.
पण हे सगळं कसं पचवायचं? कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने?
की आयुष्यभर पोटात साठवत राहायचं…??
आणि वरून शांत असल्याचं नाटक करत राहायचं?

विषय: 
प्रकार: 

रूटस्

Submitted by शर्मिला. on 17 February, 2026 - 00:51

रूटस्

वर्ध्याहून निघालेली रिक्शा दुपारच्या वेळी हमरस्त्याला लागली तशी मी आजूबाजूच्या खुणा शोधायला लागले. करकरीत डांबरी रस्त्यावर काहीच ओळखीचं वाटत नव्हतं. मुळात हा रस्ता तरी कुठे हमरस्ता होता तेव्हा? आणि रिक्षाही नव्हत्याच की!

विषय: 
शब्दखुणा: 

बाळ कान्हा

Submitted by आर्त on 16 February, 2026 - 08:35

तेच गोकुळ, तोच नंदबा,
तीच यशोदा माता,
पण मी ना राहिलो गोपसखा
कान्हा बाळ आता.

सोडुनिया तट यमुनेचा
धरला मी तीर समुद्राचा,
चौरंग सेनेचा अधिपती
मी स्वामी सुदर्शनाचा,
काही म्हणती कपटी मजला
काही विश्वाचा निर्माता…

नाही गाफिल मौज,
आज ना बेफिकीर खेळ,
निमिषात एका तुटला
बालपणाशी मेळ,
प्रौढपणाने येऊन धरले
अकस्मात माझ्या हाता…

धैर्याने लढलो पुनःपुन्हा
अनेक झंझावाती,
शेल्याशी बांधल्या मी
नव्या अनुभवाच्या गाठी,
माझेच प्रतिबिंब मजला
आज येती ना ओळखता…

विषय: 

काटा वजनाचा --७

Submitted by सुबोध खरे on 12 February, 2026 - 01:34

काटा वजनाचा --७

स्त्रियांच्या बाबतीत वजन फार पटकन वाढते असा अनुभव आहे. यात आयुष्याचे तीन कालखंड फार महत्त्वाचे आहेत.

१) पौगंडावस्था
२) गरोदरपण
३) रजोनिवृत्ती

१) पौगंडावस्थेत म्हणजेच वयात येण्याच्या आसपास आपल्या मुलीचे वजन फार पटकन वाढले असा बऱ्याच स्त्रियांचा अनुभव आहे. याचे कारण काय?

विषय: 
शब्दखुणा: 

सखी मंद झाल्या तारका...

Submitted by अजय चव्हाण on 12 February, 2026 - 00:40

"सखी मंद झाल्या तारका..
आता तरी येशिल काऽऽ.. येशिल का?"


पहाटे पाच वाजता मी बाहेरच्या झोपळ्यावर बसून गात होतो. "येशिऽऽऽल का? येशिऽऽल का?" राहून राहून सूर इथेच अडकत होते. खालच्या सूरांत मनाला समजाऊन पाहिलं. वरच्या सूरांत दरडावणंही झालं पण नाहीच दोनच शब्द पण त्यातली आर्तता असंख्य, अथांग, अगणित, अमर्याद, अस्वस्थ, असह्य.. पुढे गावसं वाटतं होतं पण मन थांबलेलं तिथेच...अजुनही ती वाट पाहतं...डोळ्यांतल्या बाहुल्यांत नकळत व्याकुळता काठोकाठ भरलेली. इतकी की,
ह्या व्याकूळतेत एक अख्खा समुद्र बुडाला असता.

विषय: 

द गर्लफ्रेंड..

Submitted by प्रथमेश काटे on 10 February, 2026 - 23:43

भाग १ - अनपेक्षित भेट (Chance Reunion)

त्या रम्य सायंकाळच्या वेळी, नीरज आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत एका कॅफे मध्ये बसला होता.

"काय रे, आज खूप आनंदी दिसत आहेस." त्याचा मित्र रविने थट्टेच्या सुरात विचारलं.

"आठवडाभर ऑफिसमध्ये राब राब राबल्यानंतर, आज मित्रांसोबत एन्जॉय करायला मिळतंय, मग आनंद तर होणारच.

"हं. बरं मित्रांनो... आज आपल्यासोबत कोणीतरी सामील होणार आहे. कुणीतरी खास" रवि ने एकदम जाहीर केलं.

"खास? कोण?" नीरज ने आश्चर्याने विचारलं.

"पहा, ती आलीच ती." कॅफेच्या एन्ट्रन्स कडे पाहत रवि म्हणाला.

सुपर मॅन

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 09:38

आठवतंय…
तू खूप लहान होतास.तुझी जिज्ञासा खूप मोठी होती.तेव्हा मी तुझ्यासाठी सुपरमॅन होतो.तुझ्यासाठी मी सूर्यसुद्धा आणू शकतो, असं तुला वाटायचं.
या जगातला सर्वात ताकदवान माणूस जर कुणी असेल,तर तो नक्कीच मीच (तुझा बाबा)आहे, असाच तुझा दृढ विश्वास होता.
तो काळ…
जेव्हा मी नुकताच बाबा झालो होतो.मी मात्र नेहमी थोडा घाबरलेलाच असायचो…
एका विचाराने —
तो दिवस आला तर काय करीन,जेव्हा तुला कळेल की
तुझे बाबा काही सुपरमॅन नाहीत, ही-मॅन नाहीत,ते तर फक्त या शहरातले,साधीशी नोकरी करणारे,अगदी साधा माणूस आहेत.
कदाचित त्या भीतीमुळेच

पाच लघुत्तम कथा

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 09:19

१) जर हे त्याचे शरीर आहे , तर ती त्या शरीराचा आत्मा आहे.

२) त्यांची आठवण मला येत नाही ! कारण आठवण्यासाठी पहिला त्यांचा विसर पडावा लागतो.

३) झाडाला काय माहीत की त्याच्या सावलीत विसावणारा माणूस एक लाकूडतोड्या आहे.

४) ते भेटत नाहीत, ते वेगळे ही होत नाहीत.त्यांच अस्तित्व आणि नातं जमीन आणि आकाशा सारखे आहे .जवळीक खूप आहे, पण नातेसंबंध नाहीत.

चला पतंग उडवूया!

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 08:48

ते अंत्यविधी नंतरच्या आठवड्याचे दिवस होते. तिने आपल्या मेहनती शाखा व्यवस्थापक पतीचा अंत्यविधी गेल्या आठवड्यातच आटोपला होता ,तिचा प्रिय पती,ज्याने दिवस रात्र कष्ट करून साध्या लिपिकापासून बँकेच्या व्यवस्थापकापर्यंतची प्रगती केली होती, आपल्या दोन मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते,परदेशात नोकरीला पाठवले होते आणि तिला एक संपूर्ण व सुखी जीवन दिले होते.

Pages

Subscribe to RSS - लेखन