लेखन

अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई

Submitted by चिनूक्स on 20 April, 2010 - 15:16

मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.

ए.वे.ए.ठि. नको पण वॄत्तांत आवर...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

डीसीला झालेल्या महाग्गटग आणि महानगटग बद्दल लिहीलेल्या वॄत्तांतानी आईसलँड्ला फुटलेल्या ज्वालामुखी एवढी जागा व्यापल्यामुळे पुढील सर्व ए. वे. ए. ठि, गटग, वर्षा-वसंत-हेमंत्-विहार इत्यादी स्नेहसम्मेलनांच्या वॄत्तांतांवर पुढील नियम (हुकूमावरून) लागू करणेत येत आहेत. तसे न केल्यास आपली 'रिक्षा' जागोजागी अडवून तिच्यातली हवा (आणि हवाही) काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी...

प्रकार: 

कळले नाही...!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मी थांबले आणि संपले कधी, कळले नाही
वाटेत एकटी राहीले कधी, कळले नाही

मी उन्हात सुद्धा जात राहीले तुझ्याच मागे
पायाचे तळवे पोळले कधी, कळले नाही

ऋतू आले गेले, वाट पाहीली तरी तुझी मी
ते वेडे वय अन् सरले कधी, कळले नाही

मी बेरीज करता सारे काही वजाच झाले
अन् शून्य फक्त हे उरले कधी, कळले नाही!

विषय: 
प्रकार: 

नि:शब्द

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अंधाराला सरावली नजर
खिडकीतले तारे मोजत्येय..
नेमके किती?
ह्या मनाने काहीही उत्तर दिलं तरी
ते मन खोडू शकणार नाही याची खात्री!

दिवा लावायची भिती वाटत्येय..
प्रकाशात कदाचित आरश्यानेही ओळख दिली नाही तर?
सख्या झालेल्या या भिंती, घाबरून मागे सरल्या तर?

खिडकीवर झुकलेले माड..
त्यांच्या नजरेतलं कुतूहल कधीच ओसरलयं..
आताश्या ते फक्त आधार देतात-
आठवणींची मोळी वाहत; उन्हं उतरत कुठेतरी जाणार्‍या दिवसाला आणि
ओळखदेख असून नसल्यासारखे दाखवत, नि:शब्दपणे वावरणार्‍या रात्रीला...

विषय: 
प्रकार: 

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

Submitted by अभय आर्वीकर on 28 March, 2010 - 10:17

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.

मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.

शब्दखुणा: 

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

Submitted by अभय आर्वीकर on 16 March, 2010 - 22:27

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.

संवाद : गुरू ठाकूर

Submitted by नमुसी on 22 February, 2010 - 01:28

'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच! एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं.

लॉराचे ' लिटल हाऊस '

Submitted by शर्मिला फडके on 21 February, 2010 - 10:11

लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते.

शिवजयंती

Submitted by चप्पलचोर on 19 February, 2010 - 06:57

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

"निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
- समर्थ रामदास

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन