लेखन

मनश्री

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 3 June, 2010 - 01:00

मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो.

विषय: 

कर के देखो - संपा. श्री. सदा डुंबरे

Submitted by चिनूक्स on 1 June, 2010 - 08:01

दांडीयात्रेच्या वेळी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला होता. पण त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल शंका असणारे, घेणारे भरपूर होते. या मिठाच्या सत्याग्रहानं नक्की काय साध्य होणार? ब्रिटिश सत्ता हलायचीसुद्धा नाही तुमच्या चिमूटभर मिठाने.. अशी शंका घेणारे केवळ सामान्य लोकच नव्हते, तर मोतीलालजी नेहरूंसारखे नेतेही होते. मोतीलालजींनी गांधीजींना एक मोठ्ठं बावीस पानी पत्र लिहिलं. मोतीलालजी होते बॅरिस्टर. त्यांना नवीन मुद्दे मांडून समोरच्याला नामोहरम कसं करायचं, ते पुरतं ठाऊक होतं. 'या सत्याग्रहानं काहीही साध्य होणार नाही. झालंच तर हसं होईल.

फुलपाखरू.....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अंगावरचं निथळणारं पाणी टिपत ती बेडरूम मध्ये शिरली. केसांना गुंडाळलेला टर्किश टॉवेल भिजून अजूनच चिंब झाला होता. बाथकोटच्या गाठीला पुन्हा एकदा नीट बांधून तिने केस मोकळे सोडले. ओला टॉवेल तसाच कोपर्‍यात भिरकावून ड्रेसर मधून दुसरा टॉवेल काढला.

विषय: 
प्रकार: 

झोंबी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 23 May, 2010 - 05:03

आनंद यादव ह्या नावाला “नटरंग” सिनेमामुळे आता वलय प्राप्त झालंय. त्यामुळे “पुस्तक-मित्र” च्या लायब्ररीत त्यांचं “झोंबी” पुस्तक दिसल्याबरोबर लक्ष वेधल्या गेलं.

पुस्तक उघडल्याबरोबर “झोंबी” ह्या पुस्तकाला मिळालेले पानभर पुरस्कार दिसतात त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढते. त्यात पुढे पु.ल.देशपांड्यांची प्रस्तावना…….मग काय विचारायलाच नको. त्यांनी त्या प्रस्तावनेला नाव पण इतकं सुरेख दिलंय….! “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड” ! ह्या नावामुळे नक्कीच काहीतरी जगावेगळं असेल ह्याची कल्पना येते. कारण बाल्याला “बालकांड” संबोधलंय म्हणजे बराच भोग, हाल अपेष्टा, गरीबी असणार असं वाटतं.

विषय: 

मी, माझे वडिल आणि भ्रष्टाचार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

१९७५ सालच्या दरम्यान कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर WG Forge Allied Industries नावाची एक कंपनी सुरू झाली. गावातले लोक तिला वायमन गार्डन, वायंगान कार्ड पासून काहीही म्हणायचे. खरंतर ते Wyman Gordon होतं. माझे वडिल या कंपनीत सुरुवातीला Security Guard, आणि नंतर काही वर्षे Security Supervisor म्हणून काम करायचे. तिथे काम करणारे बहुतेक लोक हे भारतीय सेनेतून रिटायर होऊन आलेले गावकरी सैनिक होते. पहिल्या पाच सहा महिन्यात सुरक्षेबरोबर Transportation ची कामंही त्यांच्यावर आली. चार शिफ्ट, त्यासाठी नेणार्‍या आणणार्‍या बसेस, मॅनेजरांच्या दिमतीला असलेल्या गाड्या, टेम्पो इत्यादी वाहनांची जा/ये सतत चालू असायची.

प्रकार: 

माझी आई आणि तिची आई

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मी माझ्या आईवर खूप जास्त अवलंबून आहे. आधीही होतेच, पण लग्न, स्वतःचा संसार, स्वतःचं मूल झाल्यानंतरही आई अजूनही सारखी लागतेच. जरा कुठे खुट्ट झालं, एखादा पदार्थ करायचा असला, चार लोक येणार असले, लेक आजारी पडला, ऑफिसात/ घरी वाद झाले की सगळे आईच्या कानात ओतल्याशिवाय चैन पडत नाही! प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोनचं प्रमाण अर्थातच जास्त. कारण फोन कानाला लावणं सोपं. आता एकाच गावात रहातो, सर्व सुविधा हाताशी आहेत म्हणून आईशी सतत बोललं जातं असंही नाही. ती सवयच आहे, किंवा नैसर्गिक ओढ- सगळं आईला सांगायची.

विषय: 
प्रकार: 

'A Pack Of Lies' - गौरीच्या मुलीचं पुस्तक

Submitted by शर्मिला फडके on 1 May, 2010 - 03:12

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.

'खूब लडी मर्दानी'च्या निमित्ताने..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

खूब लडी मर्दानी.. मर्दानी?
हो, स्त्री असूनही स्त्रीत्वाच्या मर्यादा सांभाळून आपल्या हक्कासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी लढणारी मर्दानी!
एका स्त्रीला काय हवं? सहा महिने तरी कुटुंबाला पुरेल एवढे अन्न आणि सहा महिने तरी धकवता येइल एवढे सरपण..
मनुला-मणिकर्णिकेला कधी वाटलं असेल का, तिचा असा एक comfort zone असावा? राजबिंडा पती-संसार-मुलं..बस्स्-हेच जीवन असावं? ती स्त्रीच होती, तिच्याही मनाशी ह्या भावना असतीलच. पण, या जगात-'किसीको मुक्कमिल जहाँ नही मिलता'..

विषय: 
प्रकार: 

अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई

Submitted by चिनूक्स on 20 April, 2010 - 15:16

मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.

ए.वे.ए.ठि. नको पण वॄत्तांत आवर...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

डीसीला झालेल्या महाग्गटग आणि महानगटग बद्दल लिहीलेल्या वॄत्तांतानी आईसलँड्ला फुटलेल्या ज्वालामुखी एवढी जागा व्यापल्यामुळे पुढील सर्व ए. वे. ए. ठि, गटग, वर्षा-वसंत-हेमंत्-विहार इत्यादी स्नेहसम्मेलनांच्या वॄत्तांतांवर पुढील नियम (हुकूमावरून) लागू करणेत येत आहेत. तसे न केल्यास आपली 'रिक्षा' जागोजागी अडवून तिच्यातली हवा (आणि हवाही) काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी...

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेखन