स्वीडनच्या आर्क्टिक भागातलं एक लहानसं गाव- बेअरटाऊन. हे गाव आइस-हॉकीच्या प्रेमात बुडलेलं आहे. They talk ice-hockey, eat ice-hockey, sleep ice-hockey अशी परिस्थिती. गावात बेकारी वाढीस लागली आहे. बिनकामाची किंवा कामासाठी गाव सोडावं लागलेली माणसं वाढत चालली आहेत. अशा काळात हॉकीचाच (पुस्तकात बहुतेक ठिकाणी फक्त ‘हॉकी’ असाच उल्लेख आहे) त्यांना मोठा आधार वाटतो. १५-२० वर्षांपूर्वी बेअरटाऊनचा पुरुष संघ स्वीडनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलला गेलेला. तो या गावाच्या हॉकीच्या इतिहासातला सर्वोच्च, सोनेरी क्षण. पण त्यानंतर इथल्या हॉकीत विशेष काहीच घडलेलं नाही.
कठीण निर्णय होता. पण काय करणार?
शेवटी आपलीच मुलगी. आई वडील म्हणून आपण जितकं समजवायचं ते सगळं केलं.
तिचीच तीव्र इच्छा होती की तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय.
म्हणूनच आपण त्याला मान्यता दिली. ती म्हणाली तिचं स्वप्न ती मुलगा बनूनच पूर्ण करू शकेल.
आज आपल्या मुलीचं एका मुलामधे यशस्वीपणे परिवर्तन झालं आहे.
आपण अजूनही त्याचा उल्लेख 'ती' असाच करतोय.
तोंडात बसलंय ना. पण प्रयत्न करू संबोधन बदलायचा. नावही बदलायला हवं. लोकांनाही सांगायला हवं. काय लपवणार?
काय ठेवूया नवीन नाव?
एक थकलेला दिवस, तिच्या थकलेल्या खांद्यावरुन घेऊन ती निघाली.
नेहमीचाच रस्ता तिला लांब वाटत होता. डोकं जड झाल्यासारखं, पायात त्राण नसल्यासारखं वाटत होतं. मानगुटीला बसलेल्या वैतागाला घेऊन तिने प्रयत्नपूर्वक झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली.
तेवढ्यात तिच्या कानावर शीळ पडली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर सायकलवरून एक मुलगी तिच्या दिशेने येत होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी गळ्यात स्कार्फ, डोक्यावर टोपी होती. आपल्याच तालात मस्त शीळ वाजवत सायकल चालवत होती. तिच्या निळसर डोळ्यातून, चेहऱ्यावरून आनंद झळकत होता.
निसर्ग आणि कविता म्हटलं की पहिले आठवतात बालकवी. त्यांच्या निसर्गकविता आपल्या शाळेपासूनच्या सोबती. फुले, वेली, तारे, झरे, पक्षी या सगळ्याचं जणून समूहगान त्यांच्या कवितांत असते. त्या तशा निर्मनुष्य असतात. कुठे माणसांचे उल्लेख दिसत नाहीत. मग मानवी भावभावनाही निसर्गावरच आरोपित करतात. त्यांच्या नंतरच्या कविता पाहिल्या तर कठोर आयुष्याच्या वास्तवाच्या झळा सोसवेनात म्हणून तर ते निसर्गात रममाण होत नव्हते ना ? असा प्रश्न पडतो. जीवनव्यवहाराकडे पाठ फिरवून "पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर"?
पत्रापत्री
—------
नावाप्रमाणे ही पत्रापत्रीच आहे, म्हणजे माधवराव आणि तात्यासाहेब ह्या दोन साठीतील (अंदाजे) निवृत्त मित्रांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आणि त्या पत्रांतून उलगडत गेलेल्या घटना, माणसं, कुटुंब, कुटुंबीय आणि पर्यायाने सामाजिक परिस्थितीचा, सामाजिक मनस्वास्थ्याचा आरसा!
गावाच्या शेवटच्या टोकाला, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. तिथंच राहायचा अर्णव, एक शांत आणि गूढ स्वभावाचा तरुण!
गावाच्या दुसऱ्या टोकाला राहायची सायली, जणू चंद्राच्या शीतलतेसारखी. सुंदर आणि हळवी!
पहिल्यांदा त्यांची भेट झाली गावातील जुना वडाच्या झाडाखाली.
सायलीला वाचनाची आवड होती, आणि अर्णवला लेखनाची.
समोर पसरलेला मोठा कोरा कागद.. त्याशेजारी कोरून ठेवलेली पेन्सिल, पांढराशुभ्र खोडरबर.. आणि कागदावर काय चित्र काढावं याचा विचार करत तिथेच अडकून पडलेलं तिचं मन.
खूप कठीण निर्णय होता हा. पण काय करणार?
हो ना. शेवटी आपलीच मुलगी ती. तिचं मन, तिची इच्छा सर्वात महत्वाची.
खरं आहे. एका मर्यादेपलीकडे आपण काही करू शकत नाही.
आता आई वडील म्हणून आपण जितकं सांगायचं, समजवायचं ते सगळं केलं. काही कमी केलं का आपण? पण काय उपयोग झाला?
आपले प्रयत्न कमी नाही पडले. पण तिचीच आतून तीव्र इच्छा होती की तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय. तिचा ठाम विश्वास होता की ती चुकीच्या शरीरात आहे आणि तिला त्याच्यात कैदेत पडल्यासारखं वाटतंय.
परसेप्शन.. सत्य.. सौंदर्य.
मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली.