अनुवादकांच्या एका सुंदर संमेलनात प्रकाशक म्हणून सहभागी होण्याची संधी मला नुकतीच मिळाली. त्या संमेलनाचा वृत्तान्त पुढे देत आहे. ज्या मंडळींना या क्षेत्रात काही काम करण्याची इच्छा असेल, त्यांना - कदाचित - काही उपयोग होऊ शकेल.
~
*नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाविषयी!*
माझ्यासाठी तुझे ते गाणे असू दे
सांगायास काही गाऱ्हाणे असू दे
तुझ्यासारखे कैक वेडे इथे रे
मज सारखे काही शहाणे असू दे
नवे यमक काही सुचलेच नाही
जुळलेले शब्द जुने पुराणे असू दे
विरहाचे क्षण आहे मनी पण
आठवणीत चोरून पाहणे असू दे
खरे सुख आहे तुझे तुज पाशी
जरा दुःख गोजिरवाणे असू दे
जीवनास या अर्थ नसेल तरीही
जगायास थोडे बहाणे असू दे
इथे काय सारेच कविवर्य नाही
दोन चार श्रोते दिवाणे असू दे
- अमेय
7387674171
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :
शब्दांचे बुडबुडे..
मी का लिहिते आहे कुठपर्यंत लिहिणार, कधी थांबणार, का आणि कोणत्या विषयावर लिहिणार याचे कोणतेही ठोस उत्तर माझ्याकडे नाही. हि सुरुवात करताना मी सुद्धा स्वताला खूप सगळे प्रश्न विचारते आहे आणि प्रामाणिकपणे उत्तर देते आहे. काही शब्द तर फक्त माझ्याभोवतीच येऊन थबकतात, अडखळतात, रुंजी घालत राहतात...
आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?
(या माझ्या लेखावर मला अगदी प्रामाणिक प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. माझे येथे काही चुकत असेल तर तेही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.)
खरं तर हा लेख लिहायला मी योग्य व्यक्ती नाही असं मला वाटतं. कारण मी स्वत: किंचितसा लेखक आहे आणि बराचसा प्रकाशक. तरीही या विषयावर लिहिण्याची ओढ स्वस्थ बसू देत नाही म्हणून लिहित आहे. वाचकांनी त्याबद्दल मला मोठ्या मनाने क्षमा करावी.
आज कोरोनाच्या संकटामुळे आपल्यापैकी बरीच मंडळी घरी बसून आहेत (किंवा त्यांनी तसे बसणे अपेक्षित आहे.). वाचनासाठी आता नक्कीच आपण वेळ काढू शकतोय.
"स्वयम , हे बघ आता तू हा धडा नीट वाचलास किनई, मग आता मला सांग या प्रश्नाचे उत्तर, की नदीशी आपण काय बोललो असतो.. "माझ्या चौथी मधल्या मुलाचा मी अभ्यास घेत होते, पण माझे मन भूतकाळात गेले होते. ते पोचले होते, अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या काळामध्ये.
सात -आठ वर्षांची मी पुस्तक वाचत होते आणि माझे पपा तेव्हाच्या मला सांगत होते, "तायडे, आज मी संध्याकाळी जेव्हा घरी येईन ना, तेव्हा मला तू ही गोष्ट सांगायची बरंका, नीट वाचून ठेव. "
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
एक काळ होता तेव्हा मी "मनोगत" वर पडीक असायचो. आयटी मधील नवी नोकरी आणि इंटरनेटची सुविधा. ऑनलाईन वाचन हि संकल्पना माझ्यासाठी नवीन होती. मला मजा यायची ऑनलाईन वाचायला. सतत काही छान वाचायला मिळतंय का ते बघायचं.
छान म्हणज, जे मला छान वाटतं ते.
असंच एकदा चाळत असताना तुझी 'कॉफी' दिसली. म्हटलं बघूया कशी वाटतीये !
कॉफी हा प्रकारच वेगळा आहे. कॉफी म्हंटलं कि येतं प्रेम आणि सोबतच विरह सुद्धा !
कॉफीचा कडवटपणा जितका जास्ती, तितकी तिची नशा जास्ती !
तुझी 'कॉफी' वाचताना अगदी असंच काहीसं वाटलं.