पुणे
गोळाबेरीज
आज वर्षातला शेवटचा दिवस..
या गोरठलेल्या थंडीत, कडक वाफाळता चहा पीत सगळ्या कडू गोड आठवणींचा पुन्हा एकदा आस्वाद घेत मी बसली होती..
या वर्षातील आठवणींनी, अनुभवांनी आणि 'आपलं माणूस' म्हणता येईल अशा जीवाभावांच्या लोकांनी भरलेली माझी समृध्द ओंजळ न्ह्याहाळत होती..
पाहता पाहता हे ही वर्ष निघून गेलं..प्रत्येकाने आज मनाच्या पटलावर आपल्या वर्षाचा हिशोब मांडलाच असेल..
कुणासाठी यश घेऊन येणार हेच वर्ष कुणाला मात्र अपयश देऊन गेलं असेल..
कुणासाठी प्रत्येक क्षण आनंदाचा तर कुणासाठी दुःख वारेमाप असेल..
कुणाला भेटला साथी आयुष्याचा तर कुणाचे आभाळ हरवले असेल..
कवितेचे रूप द्यावे..
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले..
फुटली पालवी आठवणींच्या रोपट्यांना
पुन्हा कागदावर शब्द उमटले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
मी सक्त दिली ताकीद हृदयाला
शांत राहण्याची
रागावूनी मीच जरासे
मीच पुन्हा कुशीत घेतले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
रात्र गेली सरूनी
नवसुर्या चे तेज अवतरले
रात्रीस खेळ भयाण होता
दिवसा फक्त ते स्वप्न उरले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
तीच खुणावी डोळ्यांनी
बंधन आता होवु घातले
आयुष्याच्या मातीवरती
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझ्या येण्यानी सृष्टीसारी सुखावते
हे तू जरा विसरून गेलास का...???
एवढ्यात तू जास्त बरसलासं
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझं नेहमीचं पडणं म्हणजे
दोन महिने तीन महिने हेच का...???
पण यावेळी वेगळा वागला आहेस
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझ्या येण्याने माणसं सुखावून गेली
आनंदाने सगळीकडे उधाण आल का...???
नेहमी सारखं वागणं कस असतं
हे तू जरा विसरून गेलास का...???
चार दिवस पाहुणा असतो तू
हे विसरून यावेळी वागलास का...???
आनंदावर विरजण घालून गेलास
हे तू जरा विसरून गेलास का...???
उन्हाळा तुम्हाला जरा वाटून देऊ का...???
उन्हाळा तुम्हाला जरा वाटून देऊ का
पाऊसाचा प्रत्येक थेंब मी घेऊन जाऊ का...???
भरून येणाऱ्या आभाळाला मात्र
माझ्या कडे मी घेऊन जाऊ का...???
उन्हाळा तुम्हला जरा वाटून देऊ का...???
आमच्याकडे पाऊसच पडत नाहीये
कोरड्या जमिनीची ढेकळ तुम्हला देऊ का...???
आमच्या कोरडवाहू जमीसाठी मात्र
मी हा पाऊस घेऊन जाऊ का...???
उन्हाळा तुम्हाला जरा वाटून देऊ का...???
देव
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तु कोंबड्या बकऱ्यांचे नैवद्य देवून मला आपलेसे करू पाहत होता.
मला तर फक्त तुझ्या मनातील भोळा भाव हवा होता.
पण तू अंधश्रद्धेच्या इतका आहारी गेलास .
की स्वतःलाच संपवून बसलास..
तु इतका क्रूर झालास.
की स्वतः मधील देवत्व च विसरून बसलास.
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तू मला अर्पण करण्या मुक्या प्राण्याला कापत होतास..
कसं सांगू तुला माझा जीव किती तुटत होता.
वरूणराजा
पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे
द डेथ ट्रॅप भाग १
नाते जन्मांतरीचे
Pages
![Subscribe to RSS - पुणे](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)