स्वतःला उपयोगी पडेल असे काही निर्माण केलेले किंवा शोधून काढलेले, पद्धती तयार केलेले आणि त्याचा उपयोग होतो आहे हे अनुभवास आलेले असले की त्या निर्मिती च्या बाबतीत दोन विचार करता येतात. पहिला असा की अश्या निर्मितीला बौद्धिक संपदा म्हणून पेटंट मिळवता येऊ शकतात ज्यानंतर त्या संपदेचा कुणी वापर केला तरी तुम्हाला त्याचा मोबदला मिळत रहावा. दुसरे असे की ती निर्मिती जगाला तशीच मुक्तपणे उपलब्ध करून देता येऊ शकते, जे जनहिताचे एक धोरण म्हटता येईल, आणि सॉफ्टवेयर क्षेत्रात असे जेव्हा सुरू झाले त्याला मुक्तस्रोत निर्मिती म्हटले जाऊ लागले.
.
या आधीचा भाग – https://www.maayboli.com/node/86463
.
मागच्या लेखात मी उल्लेख केला होता १९८० च्या दशकात झालेल्या महत्वाच्या घडामोडीचा आणि नंतर १९९० च्या दशकात आलेल्या मोफत संचालन प्रणालीचा. त्याचे कालानुसार सारांश बघुया.
.
१९८३ – रिचर्ड स्टॉलमॅन यांनी जिएनयू प्रकल्प सुरू केला
१९८५ – फ्री सॉफ्टवेयर फाऊंडेशन तयार केले आणि जिएनयू जिपिएल हा करार शब्दबद्ध केला
१९९१ – लिनस टॉरवाल्ड यांनी लिनक्स कर्नल लिहिले आणि कालांतराने त्याला मोफत उपलब्ध करून दिले
.
.
एकोणीसशे ऐंशी च्या दशकात युनिक्स नावाची संगणक संचालन प्रणाली लोकप्रिय होत होती. संगणक आपल्या मेंदूपेक्षा अधिक गतीने ठराविक दिलेली कामे करणारे यंत्र आहे असे मानले तर संगणकाला आपली कामे संगणकाच्या भाषेत सांगू शकेल आणि आपल्याशी संवाद साधू शकेल अशी प्रणाली लागते आणि तिला मी संचालन प्रणाली म्हणतोय.
.
युनिक्स अशीच एक संचालन प्रणाली होती. सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचे तर आता आपल्याला माहिती असलेल्या संचालक प्रणाल्या म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज, उबुंटू आणि मॅकओएस या संगणकावर चालणाऱ्या आणि आयओएस आणि एंड्रोइड या मोबाईल वर चालणाऱ्या संचालन प्रणाल्या आहेत.
.
तू हरवली आहेस कुठेतरी .
तू हवी आहेस मला. अगदी पूर्वी सारखी. अवखळ स्वभावाची तरीही शांत.
तुला शोधते आहे.
गाण्यांमध्ये शोधले तुला. अगदी मराठी हिंदी आणि इंग्रजी. तू भेटलीस मला फार थोडी. अगदी पुसटशी ...अशी पुसटशी नको हवी होतीस तू.
मग शोधायला लागले तुला ... पुस्तकांमध्ये .... अगदी रोज ....ऐकणाऱ्या पुस्तकातून ... वाचणाऱ्या पुस्तकातून ...
कारण तुला पुस्तके वाचायला आवडतात ना..
तू भेटलीस मला ... अगदी रावण , सीता , १९९०, आई समजून घेताना, सत्याचे प्रयोग, अश्या खूप साऱ्या पुस्तकातून.
तरीही एकतर्फा ... मला तू चोवीस तास माझ्या बरोबर हवी आहेस.
वाईट सवई.
1:किती ते प्रगल्भ लिहिणे. किती तो गाढ अभ्यास. किती तो आत्मविश्वास. किती तो सेल्फ कंट्रोल. कसे जमते ?
2:जमते बाबा आपले असेच. मनाची इच्छा असेल आणि करायला काही नसेल तर आपोआपच वळतात हात पुस्तकांकडे
1: मी तर आपले झोपण्याचे काम करेल त्यापेक्षा. पण पुस्तक नाही हातात घेणार.
2: जन्मजात वैराग्य पत्करलेले आम्ही . काय करणार सारखे झोपून . कधी कधी झोपेचाही कंटाळा येतो आम्हाला. मग थोडे झोपेलाच कंटाळतो आम्ही आणि लागतात अश्या वाईट सवई ... पुस्तके वाचण्याच्या. काय करणार.
आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं. आमच्या वर्गात मात्र ३-४ पोर होती जी म्हणायची मी कोट्याला जाणार आयआयटी ची तयारी करायला. कोण बोलायचं ब्रेन सर्जन होणार. च्यामायला ऐकून भीती वाटायची ओ. एवढ्या कमी वयात एवढी स्पष्टता... कौतुक वाटायचं त्यांचं.
सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही. पुढच्या काळात या सोहळ्याविषयी कुतुहल वाढत गेलं आणि कधीही न चुकता या सोहळ्याचं फक्त दूरदर्शनवरच थेट प्रसारण पाहण्याचा पायंडा पडला.
हाय
सगळ्यांना नमस्कार !
सध्याचे गप्पांचे ओनलाईन अड्डे काय आहेत ?
जनरल नव्या लोकांशी गप्पा मारणे , माहिती करून घेते विविध गप्पांच्या विषयांवर.
मला विपू मध्ये कळवा
फन एलिमेंट इन लाईफ ...
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत. उमेद भवन राजवाडा स्वातंत्र्यप्राप्तीच्या जेमतेम चार वर्षे आधी बांधून पूर्ण झाला होता. त्यामुळं हा उपखंडातला सर्वात तरूण राजवाडा मानला जातो. आम्ही हा राजवाडा पाहायला गेलो, त्या घटनेला आता 33 वर्ष होत आली आहेत, पण तरीही त्या आठवणी अजून ताज्या आहेत.