संसदेत जर एका विशिष्ठ वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती सभासद असेल तर अश्या संसदेच्या कामकाजात त्या वर्गाचे बद्दल व्यक्त केली जाणारी भावना शब्द आणि निर्णय आपोआपच तपासले जातात आणि त्यांच्या हक्कांची पायमल्ली होणे टाळता येते. ही कल्पना मला पटते, याच कल्पनेला रोजच्या आयुष्यातल्या विचार प्रक्रियेसाठी अमलात आणण्यासाठी एक वैचारिक प्रयोग मला करावासा वाटतो.
.
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
.
या प्रश्नाचे एक मला पटणारे एक उत्तर वाचायला मिळाले, ते पुढे सांगतोय.
.
मला हा प्रश्न नेहमी पडायचा की उदाहरणार्थ लॉगॅरिदम, कॅलकुलस सारखे विषय अभ्यासात का शिकवले जातात. जर रोजच्या आयुष्यात जगतांना या गोष्टी लागणारच नाहीयेत तर हे शिकण्यासाठी वेळ का वाया घालवायचा? शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का?
.
विज्ञानाचे शोध लागण्या आधी आसपासच्या गोष्टींचा मानवाने जमेल तसा तार्किक अर्थ लावून ते काय आहे आणि कसे चालत असेल याचा अंदाज आणि ठोकताळा घेतला आणि त्यावेळेस जे तर्काला पटेल आणि उपलब्ध माहितीवरून अधिक बरोबर वाटेल अशी उत्तरे तयार केली.
.
बरेचदा ही उत्तरे ज्यांना सुचली त्यांना ती कशी सुचली सांगता आले नसेल तेव्हा ती मला स्फुरली, किंवा मला स्वप्नात दिसली, किंवा सरळ मला देवाने सांगितली असे सांगणे सर्वात सोपे असेल म्हणून तसे सांगितले गेले. काही ग्रंथांमध्ये देखील ते लिहिले गेले. तेच मग सिद्धांत्त म्हणून सांगतिले जाऊ लागले शिकवले जाऊ लागले असे आपल्याला दिसते.
.
स्वतःला उपयोगी पडेल असे काही निर्माण केलेले किंवा शोधून काढलेले, पद्धती तयार केलेले आणि त्याचा उपयोग होतो आहे हे अनुभवास आलेले असले की त्या निर्मिती च्या बाबतीत दोन विचार करता येतात. पहिला असा की अश्या निर्मितीला बौद्धिक संपदा म्हणून पेटंट मिळवता येऊ शकतात ज्यानंतर त्या संपदेचा कुणी वापर केला तरी तुम्हाला त्याचा मोबदला मिळत रहावा. दुसरे असे की ती निर्मिती जगाला तशीच मुक्तपणे उपलब्ध करून देता येऊ शकते, जे जनहिताचे एक धोरण म्हटता येईल, आणि सॉफ्टवेयर क्षेत्रात असे जेव्हा सुरू झाले त्याला मुक्तस्रोत निर्मिती म्हटले जाऊ लागले.
.
या आधीचा भाग – https://www.maayboli.com/node/86463
.
मागच्या लेखात मी उल्लेख केला होता १९८० च्या दशकात झालेल्या महत्वाच्या घडामोडीचा आणि नंतर १९९० च्या दशकात आलेल्या मोफत संचालन प्रणालीचा. त्याचे कालानुसार सारांश बघुया.
.
१९८३ – रिचर्ड स्टॉलमॅन यांनी जिएनयू प्रकल्प सुरू केला
१९८५ – फ्री सॉफ्टवेयर फाऊंडेशन तयार केले आणि जिएनयू जिपिएल हा करार शब्दबद्ध केला
१९९१ – लिनस टॉरवाल्ड यांनी लिनक्स कर्नल लिहिले आणि कालांतराने त्याला मोफत उपलब्ध करून दिले
.
.
एकोणीसशे ऐंशी च्या दशकात युनिक्स नावाची संगणक संचालन प्रणाली लोकप्रिय होत होती. संगणक आपल्या मेंदूपेक्षा अधिक गतीने ठराविक दिलेली कामे करणारे यंत्र आहे असे मानले तर संगणकाला आपली कामे संगणकाच्या भाषेत सांगू शकेल आणि आपल्याशी संवाद साधू शकेल अशी प्रणाली लागते आणि तिला मी संचालन प्रणाली म्हणतोय.
.
युनिक्स अशीच एक संचालन प्रणाली होती. सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचे तर आता आपल्याला माहिती असलेल्या संचालक प्रणाल्या म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज, उबुंटू आणि मॅकओएस या संगणकावर चालणाऱ्या आणि आयओएस आणि एंड्रोइड या मोबाईल वर चालणाऱ्या संचालन प्रणाल्या आहेत.
.
आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा क्रमिक पुस्तके असायची. वर्गात प्राध्यापक खडू ने काळ्या फळ्यावर शिकवायचे. तेव्हा पण एकविस अपेक्षित आणि गुरूकिल्या मिळायच्या बाजारात, पण त्यांना तितका मान आणि महत्व नव्हते. ज्यांना गांभिर्याने अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी क्रमिक पुस्तकेच अभ्यासाचा आधार घटक होता.
दुनिया ये दुनिया – तुफान मेल
.
आमच्या काळी पण हे गाणे भुले बिसरे गीत विभागातच वाजवले जायचे तरीही सातत्याने ऐकल्याने सवयीचे आणि आवडीचे गाणे आहे. माझ्या एका विचाराच्या मध्ये हे गाणे कुठेतरी वाजायला लागले आणि माझ्या मनातला विचार त्या गाण्याच्या चालीत आकार घेऊ लागला.
.
दुनिया ये दुनिया – मायक्रोव्हेव ओवन
.
आता या नव्या शब्दांमध्ये चाल निट बसत नाही वगैरे काही विचार जे तुमच्या मनात येऊ लागले असतील त्यांना जरा बांधून ठेवा, कारण या वाक्यातली परिस्थिती अशी आहे की तिच्यात आपण जगतो आहोत. आपल्याला हे माहिती आहे का याचाच विचार करून बघुया.
.
.
विवेक अग्निहोत्री या चित्रपट दिग्दर्शकाने एका मुलाखतीत उच्चारलेल्या इतक्यात भागाचा उल्लेख करून त्यांची बरिच हेटाळणी केलेली वाचायला मिळते. देशभक्त या युट्यूब वाहिनीचे अभिषेक बॅनर्जी तर हे वाक्य आणि त्याचबरोबर अग्निहोत्रींचा अनक वेळा उद्दार करायला अजिबात विसरत नाहीत. तुमच्या सारख्या लोकांकडून सांगितली जाणारी तथ्ये ही तथ्ये नसतातच असे ते पूर्ण वाक्य होते असा खुलासा पण वाचायला मिळाला.
.
दार्शनिक नित्शे यांनी लिहिलेले आहे की ‘तथ्ये नसतातच फक्त निष्कर्ष असतात’ यातही त्यांचा निर्देश तथ्यांच्या सापेक्षपणा कडेच असावा.
.