माझ्यासाठी तुझे ते गाणे असू दे
सांगायास काही गाऱ्हाणे असू दे
तुझ्यासारखे कैक वेडे इथे रे
मज सारखे काही शहाणे असू दे
नवे यमक काही सुचलेच नाही
जुळलेले शब्द जुने पुराणे असू दे
विरहाचे क्षण आहे मनी पण
आठवणीत चोरून पाहणे असू दे
खरे सुख आहे तुझे तुज पाशी
जरा दुःख गोजिरवाणे असू दे
जीवनास या अर्थ नसेल तरीही
जगायास थोडे बहाणे असू दे
इथे काय सारेच कविवर्य नाही
दोन चार श्रोते दिवाणे असू दे
- अमेय
7387674171
बॉलीवूड . . . अथांग महासागर जणू. 2000 च्या नंतरचा काळ आला तो शाहरुख, सलमान, अमीर आणि सैफ अली खान यांच्या साम्राज्याचा. इतका की, 'बॉलीवूड वर 4 खान राज्य करत आहेत' असं म्हणत लोकं त्यावेळी. मूव्ही मध्ये हिरो असावा तर हाच, नव्हे एकवेळ शाहरुख खान ने व्हिलन साकारला आणि तेही पचवलं लोकांनी. असं आणि हे सगळं.
तोही होताच तिथे, फक्त लक्ष नव्हतं गेलं कोणाचं एवढच. सुरुवात तशीच म्हणजे middle class family, कोणी godfather नाही, मग कष्ट करत-करत NSD आणि struggle वगैरे-वगैरे.
१९६३/६५ सालची गोष्ट आहे . मारवाडी लोक स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची भिशी चालवीत . दुकानात ट्रान्झिस्टर्स , रेडिओ व इतर ही काही वस्तू होत्या. काही विशिष्ट मासिक रक्कम वर्षभर भरून वर्षाच्या शेवटी काही स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असंत. आम्ही पण पैसे भरले होते. बहुतेक पाच रुपये महिना होते.नक्की आठवत नाही .मला वाटतं एक दोन वर्ष भिशी ठीक चालली.नंतर एक दिवस काय झालं कळलं नाही. बऱ्याच लोकांना सांगितल्याप्रमाणे भांडी मिळेनाशी झाली. .
१९६३/६५ सालची गोष्ट आहे . मारवाडी लोक स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची भिशी चालवीत . दुकानात ट्रान्झिस्टर्स , रेडिओ व इतर ही काही वस्तू होत्या. काही विशिष्ट मासिक रक्कम वर्षभर भरून वर्षाच्या शेवटी काही स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असंत. आम्ही पण पैसे भरले होते. बहुतेक पाच रुपये महिना होते.नक्की आठवत नाही .मला वाटतं एक दोन वर्ष भिशी ठीक चालली.नंतर एक दिवस काय झालं कळलं नाही. बऱ्याच लोकांना सांगितल्याप्रमाणे भांडी मिळेनाशी झाली. .
कितीतरी बेत
जगावयाचे कितीतरी बेत होते;
पण अस्त मला कुठेतरी नेत होते...
जगण्यासाठी लढलो असेल कैकदा;
जिंकण्याचे श्रेय दुसरेच घेत होते...
पावसाळे किती आले अन् गेलेही;
इथे श्वास तेव्हढे धीर देत होते...
परिवाराचे पीक बहरले खरे;
हिरवळीचे तेही एक शेत होते...
फुकाचा सलाह देण्यात बर्बाद झालो;
बाकी जिंदगी तितकी भेत होते...
पानगळीचा मोसम सुरू झाला;
मव्हाची पानेही नशा पेत होते...
आता दिवस उरले थोडे-थोडकेच;
बेईमान गुणधर्म
इतिहासातल्या वर्चस्वाचा
प्रवासपट मांडताना
माणसाने निसर्गाचे
गमक शोधून काढले,
अन् केला कैकदा
निसर्गावर अत्याचार
पूर्वजांपासून पिढ्यान्पिढ्या...
मनगटाच्या बळावर म्हणा
अगर बुद्धिचातुर्याने,
अवघ्या सृष्टीला पादाक्रांत
करण्याच्या इराद्यात
हवी तेव्हा बदलली कूस
भौतिक गरजा शमवताना...
विविध विचारप्रवाहातून
विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडताना
विज्ञानासह तंत्रज्ञानाचा
आटापिटा चालवला,
श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे
घालून दिले नियम,
सत्तावादातून पुकारली युद्धे
तिन्हीसांज होता दिवेलागण झाली,
तुझ्या आठवणींचे तेव्हा हळूच येणे झाले ।
दबक्या पावलांनी आले चंद्र तारे ,
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
गुंतला जिव उंबऱ्यात ,
पण ना तुझे येणे झाले ।
मी लावली सांजवात ,
पण ना मला गाणे आले।
दूर कुठूनसा आला आवाज कानी ।
वाटले मला जणू तुझी चाहूल आली ।
पायातल्या पैंजनांचे तेव्हा कानी पडसाद आले ।
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
चंद्र खिडकीतून पार डोईवर आला ।
बघता बघताच अचानक ढगांआड गेला ।
वारा आला आंगचटीला पडद्याचे उडणे झाले ।
लोकमत च्या बातमी चा दुवा खाली दिलेला आहे
पारनेर मध्ये निलेश लंके ह्यांच्या विरोधात अजित पवारकडन ही सभा झाली पण त्यांनी त्यांच्या विरोधात अवाक्षर पण उच्चरले नाही
नंतर विखे पाटलांनी विनन्ती केली तेव्हा सुरु झाले
कारण काय असेल ?
तर शरद पवार अजित दादा अजूनही एकाच आहेत
बारामती ची जागा दाखवण्यासाठी अजितदादा जिंकतील हे पक्के
https://www.lokmat.com/ahmadnagar/ahmedagar-south-mva-candidate-nilesh-l...
कसा विसरलो मोठा झालो मी
मात्र आईसाठी नाही...!!
जेवण केल्यानंतर आज ही
पोटात जागा असते
मात्र आता आई च्या हातचा तो एक घास खात नाही
विखुरले असतात केस माझे
केसांचा भारा असते
मात्र आता आईला केसांचा भांग पाडून मागत नाही
चेहरा धुतल्यानंतर आत्ता ही
चेहऱ्याला पाणी चिकटून असते
मात्र आता आई च्या पदराने तो साफ करत नाही
तिच्या गोष्टी काही संपत नाही
जुन्या गोष्टींचा पिटारा खोलते
मात्र आता तिच्या मांडीवर बसून मी ऐकत नाही
कुणाचे कुणाशी दुरावे दाटलेले
मनांचे मनांशी पुरावे झाकलेले
सारीपाट हाती..सोंगट्या फेकलेल्या
नटांचे नटांशी किती देखावे पोसलेले
शोधात सगळे बांधील सोयरीकीच्या
कितीसे पसारे इथे मांडून मोडलेले …
तुझ्या काजळाच्या किती प्रती निघाल्या
डोळ्यांत बाहूल्यांचे छंदी रकाने छापलेले …
जीवनाचे सारे करार छापील होते तरीही
शेवटी ते ही हारलेले अन हे ही गांजलेले …