राजकारण

जग महाविनाशकारी तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ? - उत्तरार्ध

Submitted by राज अज्ञानी on 10 January, 2026 - 05:38

अमेरिकेत बौद्ध भिक्खूंचा एक चमू आलोक नावाच्या कुत्र्यासोबत शांतीचा संदेश घेऊन पदयात्रा करत आहे. हा कुत्रा जागतिक शांतीचं प्रतिक बनला आहे. हे बौद्ध भिक्खू आणि तो कुत्रा बातम्यांचा विषय आहे. भारतात एका रस्ते अपघातात हा कुत्रा जखमी झाला होता. तेव्हां या दरम्यान भारतात पदयात्रा करत असलेल्या भिक्खूंना हा कुत्रा जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला पूर्ण बरा केला. आता तो कुत्रा या भिक्खूंना सोडायला तयार नाही. ते जिथे जातील तिथे तो त्यांच्या सोबतच असतो. अमेरिकेत ठिकठिकाणी या भिक्खूंचे स्वागत होते, कौतुक होते आणि आलोकसोबत सेल्फी काढून घेतल्या जातात.

विषय: 
शब्दखुणा: 

जग महाविनाशकारी तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ? - पूर्वार्ध

Submitted by राज अज्ञानी on 10 January, 2026 - 03:37

असे म्हणतात कि जर तिसरे महायुद्ध झाले तर ते शेवटचे असेल.
कारण त्यानंतर जो काही विध्वंस होईल तो महाविनाशकारी असेल. या युद्धात सहभागी असलेल्या आणि नसलेल्याही देशांचे एव्हढे नुकसान होईल कि पुढची दोन तीनशे वर्षे युद्धाचा विचारही मनात येणार नाही. या महायुद्धापासून "तटस्थ" राहणे ही कल्पना भाबडी असेल. कारण त्या महायुद्धात कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत.

विषय: 
शब्दखुणा: 

धुरंधर हा राजकीय चित्रपट आहे का ?

Submitted by राज अज्ञानी on 22 December, 2025 - 01:42

धुरंधर बद्दल अनुपम चोप्रा यांनी संतुलित मत व्यक्त केलं आहे. माझ्या मते त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. तसेच त्यांचे वय आणि अनुभव बघता दोन गोष्टी त्या सांगू शकतात. पण त्यांचा रिव्ह्यू आल्याबरोबर त्यांना गलिच्छ भाषेत ट्रोल केले गेले. ही गोष्टच पुरेशी आहे कि धुरंधर हा पॉलिटिकल अजेण्डा रेटण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.

शब्दखुणा: 

१९७१ च्या युद्धविराम करारात भारताने पीओके का मागितले नाही ?

Submitted by राज अज्ञानी on 16 December, 2025 - 00:50

या आधीच्या दोन धाग्यांवर शून्य प्रतिसाद आले आहेत. याने हुरूप आणखी वाढला आहे. कदाचित बायनरी खेळातले नियम धुडकावून लावल्यास दोन्हीकडून इग्नोर करण्याचे आदेश आले असतील. लेखात काही चुकीचे असेल तर कळवा असे म्हटले होते. पण तशा चुका कुणी दाखवल्या नाहीत. प्रतिसाद नाहीत म्हणून लेखन थांबणार नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !
सहन न होऊन लेख उडवणे होणार नाही ही अपेक्षा आहे.

आज लेख लिहीत नाही. प्रश्न उपस्थित करत आहे. हा प्रश्न अनेक जण विचारत असतात. याची वस्तुनिष्ठ उत्तरे समोर येणे गरजेचे आहे..

विषय: 

दंगलींचे घाणेरडे राजकारण

Submitted by राज अज्ञानी on 13 December, 2025 - 08:42

या आधीचा धागा खालील लिंकवर पाहू शकता.
https://www.maayboli.com/node/87501

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीला भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण बदल घडला: उच्चवर्णियांच्या राजकारणातील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी जातीय (मंडल) तर बहुजनांच्या राजकीय आकांक्षांना आव्हान देण्यासाठी धार्मिक (कमंडल) ध्रुवीकरणाची रणनीती अवलंबली गेली.

विषय: 
शब्दखुणा: 

बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Submitted by जावेद_खान on 9 November, 2025 - 00:05

बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांची निवड करण्यासाठी सध्या निवडणूक सुरू असून पहिला टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबरला झाले तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला आहे. निकाल 14 तारखेला जाहीर होतील.
स्पेशल इंटेन्सीव रिविजन SIR अशा गोंडस नावाखाली मतदार याद्या बदलण्याचं सध्या जे काम चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.

अंदाज

भाजप आघाडी: १८८
राजद+काँग्रेस आघाडी: ५३
इतर: 2

राजद आघाडीच्या जागा अजून कमी होतील बहुतेक.

देवा , आता परत जावा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 October, 2025 - 14:31

देवा, कबुतरे उडवा , हत्ती पळवा
काहीच काम करू नका
पण आम्हाला मतदान करायचंय
निदान जिवंतपणी तरी मारू नका

काय नक्की चालले आहे
तेच आम्हाला कळत नाही
शेतकरी असेच उपाशी राहिलेत
नोकरी काही मिळत नाही

बेरोजगार असेच वाढत जातील
उगा खोटी स्वप्ने दाखवू नका
असेच थुंकी फिरवत राहा देवा
खुर्ची काही सोडू नका

राम राम जप अखंड चाले
भगवा काही सोडू नका
भगिनींचा बाजार मांडला
पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका

विषय: 
शब्दखुणा: 

मुंबईत 17 मुलांचं अपहरण

Submitted by जावेद_खान on 30 October, 2025 - 10:31

रोहित आर्या नावाच्या माणसाने मुंबईत 17 लहान मुलांना ओलीस ठेवले. सरकारकडे त्याचे काही पैसे बाकी होते म्हणून त्याने असं केल्याचं बोललं जातंय.

त्याने स्वतः एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलाय

https://www.indiatoday.in/india/video/any-wrong-move-and-chilling-video-...

१७ सप्टेंबर: मराठवाडा, तेलंगण व कल्याण-कर्नाटक स्वातंत्र्य दिन

Submitted by वामन राव on 17 September, 2025 - 01:07

पाकिस्तानशी "आवर्जून आणि ठरवून" क्रिकेट खेळणे गरजेचे आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2025 - 05:33

गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.

हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण