माहेरवाशीण
मराठी भाषा दिनानिमित्त एकतरी कविता लिहावी असे डोक्यात होते.एक मुलगी, माहेरवाशीण काय विचार करेल? असे डोक्यात आले आणि भाषाही हीदेखील एक प्रकारे मुलगीच जी जगाच्या अनेक प्रदेशात नांदत आहेत, त्यावर आधारित माहेरवाशीण नजरेतून लिहिलेली नवीन कविता.
मुद्दाम पहिले कडवे आणि शेवटचे कडवे संलग्न लिहिण्याचा (प्रारंभ-अंत्य) असा नवा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केलाय. नक्की अभिप्राय द्या.
सासरी दरवळतो नित्य मोगरा तरी
मृद्गंध माहेरचा कसा विसरू ?
नवीन हक्काचे घर अन् माणसे तरी
माहेरचे जागांचे ठसे कसे विसरू ?