आस
गावं झाले रिकामे पण
पेपरात भरतात सगळे रकाने
गाई बैलांची दोरी सुटली
अन् गळ्यात अमुच्या चाडी बसली
आर्त हि अमुची हाक
कोणी ऐकेल, का होऊनी ताठ
चातकाने सोडली आता
वरुण देवाची साथ
घागर भरण्या लागतेय दिस न दीस
मुंबापुरीत दहीहंडीत बसतात कोट्याधीश
लग्न या पोशिंद्याचे ठरेल का
कोणती मुलगी हो भरेल का
भेगाळलेल्या मनात माझ्या