अभ्यासाचे नियोजन कसे करावे
मुलगा नववीत आहे. शाळेची वेळ १० ते ६ आहे आणि क्लास ७ते९ सायंकाळी असतो . सकाळी लवकर उठायचा कंटाळा करतो , काय नियोजन करावे. जास्त वेळ मन एकाग्र होत नाही त्याचं काही बोलले तर चिडचिड करतो सारखं सुचना नको देऊ मला . काय करु
मुलगा नववीत आहे. शाळेची वेळ १० ते ६ आहे आणि क्लास ७ते९ सायंकाळी असतो . सकाळी लवकर उठायचा कंटाळा करतो , काय नियोजन करावे. जास्त वेळ मन एकाग्र होत नाही त्याचं काही बोलले तर चिडचिड करतो सारखं सुचना नको देऊ मला . काय करु
मागच्या एका आठवड्यात लेकीच्या शाळेचा (इयत्ता चौथी) शेवटचा दिवस होता. त्यानंतर सुट्ट्या आणि परीक्षा सुरू होणार होत्या. शेवटचा दिवस म्हणजे त्या वर्षापुरते मित्रांचा निरोप घ्यायचा. म्हणून शाळेच्या गणवेषाऐवजी छान नवीन कपडे घालायला परवानगी होती. पोरगी शाळेत जाताना उत्साहात होती. परत आली ते हातात एक कागद नाचवत आली. पगाराचा चेक जसा देवासमोर ठेवतात तसे तो कागद माझ्या हातात ठेवला. कारण आपला बाप आठवणी जतन करायला त्यांचा फोटो काढून ठेवतो हे तिला माहीत आहे. आणि ईथे मुळात तो कागदच आठवणींचा होता.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
तिचा आनंदी, उत्साही चेहरा.. कारण आज बर्याच काळाने रजनीताई भेटणार होत्या...
त्याला आठवली, तिची पहिली भेट. गालांवरील सुकलेल्या अश्रूंनी
चितारलेला रुसवा चेहऱ्यावर मिरवणारा गोडवा.. फिरत्या
शाळेत यायचंच नव्हतं तिला.. रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये दिवसभर हुंदडणं किती मजेचं. तेही वेगवेगळ्या ठिकाणी.. पण त्यानं "दादा" गिरीनं स्वतःबरोबर तिलाही डोअरस्टेप स्कूलमध्ये यायला लावलं.
आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.
हा हा माझ्या मागील सीबीएससीच्या लेखाचा उपसंहार आहे - भाग 2
जुन्या लेखाची लिंक
https://www.maayboli.com/node/78241
मागे मी लिहिले होते की सीबीएससी चे नक्कीच काही फायदे आहेत. आता कन्या सीबीएससी झाल्यामुळे - आणि ती फारसा अभ्यास करीत नसल्याने मला त्यातील काही फायदे अधिकचे दिसले . यात कुठल्याही बोर्डाची भलावण वगैरे नाही पण फायदे असतील तर ते कळणे हे आहे आणि त्याचबरोबर ज्यांची मुले जाणार आहेत किंवा ते विचार करतात त्यांना काही माहिती मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा ही इच्छा.
हुश्श! बसलो एकदाचे आम्ही सगळे गाडीत! तीनचार दिवस नुसती सामानाची बांधाबांधच चालली होती. आता इथून व्ही.टी. आणि मग तिथून नागपूर. ती ट्रेन संध्याकाळी आहे म्हणा. संदीप आणि लहानीला खूपच वाईट वाटत होतं कालपर्यंत, हे घर सोडून जायचं म्हणून. सकाळी स्टेशनवर आल्यापासून मात्र खूश आहेत दोघं. गेल्यावेळेस बाबांची बदली झाली होती तेव्हा मी लहान होते. तेव्हा माझंपण असंच झालं होतं. आज मला एकाच वेळी वाईटही वाटतंय आणि सुटल्यासारखंही.
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट
✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव
✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा!
✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव!
✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक
✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य!
✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट
जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते.
१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता