तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का? नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी?
शाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.
वॊर्डरोबचे वरचे खण म्हणजे माझ्या मते स्टोरेज कमी आणि आठवणींचेच कप्पे जास्त असतात. ही जागा जेवढी मोठी, तितक्या जास्त आठवणी. साधारणत: तुम्ही वयाची चाळीशी गाठत आलात की हे कप्पे खचाखच साठून जातात.
..
सर्व किस्से याच महिन्याभरातील आहेत, एकापाठोपाठ घडलेले, म्हणून हा प्रश्न / लेख पडला.
...
किस्सा १ -
मित्राच्या फॅमिलीबरोबर त्याच्या खाजगी वाहनातून त्याच्याच घरी जेवायला जात होतो. वेळ रात्रीची होती, मित्र स्वत: गाडी चालवत होता. मी त्याच्यासोबत पुढे बसलो होतो आणि पाठीमागे त्याची बायको आणि मुलगा बसलेला. मुलाचे नाव होते केश्विन, वयवर्षे ५-६.. हाच या छोट्याश्या किस्स्याचा नायक!
बरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.
तर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.
नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.
माझ्या वडिलांनी स्थापन केलेली शाळा- महाराष्ट्र विद्यालय, ही मध्य प्रदेशातील १९३५ साल पासून सुरू आहे.
गेल्या दोन दशका पूर्वी शाळेनी मराठी माध्यम विद्यार्थ्यांच्या आभावामुळे काढून केव्ळ हिंदी आणि इंग्रजीतून सुरू ठेवल आहे. खंत असली तरि शाळेचे विद्यार्थी देशभर पस्रलेले संघटित होऊन मराठी माध्यम पुन्रजिवीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संघटनेला भरपूर प्रतिसाद आहे; केवळ पुण्यात ३०० माजी आजवर तीनदा एकत्र आले आहेत आणि हजारवर माजींचे संपर्क साधले गेले आहेत. गेल्या १२ जानेवारीला झालेल्या सम्मेलना निमित्त मी लिहिलेल्या आठवणीं खाली देत आहे. कदाचित आवडेल वाटले म्हणून-------
शाळा - चार भिंतींच्या पलिकडची
शिस्तीत शाळा जरी पुर्ण केली मला शिस्त नाही कधी लागली,
विक्षिप्त मी वागलो कैक वेळा मुले चांगली ही जरी वागली...
डोक्यात काही शिरेनाच माझ्या सदा केस कापून मी जायचो,
वर्गात बादाम पिस्ते मनूके हळू तोंड झाकून मी खायचो...
खेळायचा तास येता चुकांडी मला खेळणे भावले ना कधी,
मातीत लोळायचे मित्रे सारे मला लोळणे भावले ना कधी...
खेळून व्यायाम होतो गड्यांनो मला गोष्ट खोटी सदा वाटली,
फ़ोडून ढेकूळ तांबूस माती अधाशापरी फ़ार मी चाटली...
पाठीवरी दप्तराचा पसारा असे धाक शाळेतही जायला,
मोजायचो वार प्रत्येकदा मी रवीवार माझा पुन्हा यायला...
हातावरी डाग काळे कुठेही निबेतील शाई तरंगायची,
दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.
शाळा! बहुतेकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. काहींना आवडली म्हणून, काहींना नावडली म्हणून. काहींनी नेमाने हजेरी लावली म्हणून, काहींनी नेटाने बुडवली म्हणून. काही हुशार होते म्हणून, काही शिक्षकांचे लाडके म्हणून, काही खोडकर होते म्हणून. काहींना आपण शाळेत घडलो असं वाटतं म्हणून, आणि काहींना बिघडलो असं वाटत असेल म्हणून. कुठल्याही कारणासाठी असेल, पण विषय मात्र जिव्हाळ्याचा!
भरतातल्या शाळा वर्षाच्या मध्ये म्हणजे ़जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये मुलांना अॅडमिशन देतात का? अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का ? की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते ? कुणाला काही माहीती किंवा अनुभव असल्यास जरूर कळवा.