कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥
कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥
नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी
नुस्त्याच फळ्याला चौकट लाकडी...
मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर
सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥
शाळेत शिक्षक इकडे तिकडे,
यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे
का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे!
बि.ए. सोडुन दुसरा मार्ग,यांना परवडला होता का कधी?॥२॥
इथले विद्यार्थी,कोचिंगला जाती
घरचे सोडून,बाहेर खाती,इथल्यापेक्षा तिथेच जास्ती
कोचिंग क्लास का लागतात गोड,जणू जेवणातली लोणच्याची फोड..

पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला 
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!
शाळा......रद्दड चित्रपट ...प्रत्येकाला आपल्या शाळेची आठवण करून दिली एवढंच काय ते यश...भंगार कथानक, - जुना काळ दाखविण्याच स्पष्टीकरण नाही, - दिलीप प्रभावळकरांना वाया घालवलय - ,माजरेकर सर ( संतोष जुवेकर) / नरूमामा (जितेंद्र जोशी) / बेंद्रे बाई / जोश्याची बहिण हि पात्र निरर्थक, - एकालाही स्वतःचा स्वभाव नाही, म्हात्रे सोडला तर नायकाचा एकही मित्र लक्षात राहत नाही, मुलांचं भावविश्व खुलवून दाखवण्यास director असमर्थ, expression देण्याची मुभा फक्त म्हत्रेलाच, कथा कुठेही रंजक होत नाही..चित्रपट चालू असताना मधेच सर्वांची नावं दिसायला लागतात, इथे चित्रपट संपतो!
मेंदी - लहानपणापासूनच लागलेलं एक वेड. सोलापूरला असताना लहानपणी फक्त नागपंचमीला मेंदीच्या झाडाची पानं तोडून वाटून तिचा लगदा करुन हातावर गोळे लावले जायचे. नंतर पावडर आणून, पंच्यातून चाळून, सगळे सोपस्कार करून पेस्ट तयार होऊ लागली. मग ती चांगली रंगावी म्हणून प्रचंड प्रयोग!!
समोर उभ्या असलेल्या शाळेच्या इमारतीच्या साक्षीने दामोदर हॉटेलच्या छोट्याशा जागेने तिशीत पदार्पण केले. शाळेची इमारत ह्या जागेपेक्षा १० वर्ष मोठी. आणि म्हणून कदाचित मोठेपणाचा आव आणीत त्या छोट्या जागेकडे सदैव डोळे वटारून बघत असते. शाळेच्या इमारतीला माहिती आहे - मोठी होऊन होऊन किती मोठी होणार ही जागा? मोठेपणाचा हक्क आणि ठेका आपल्याकडेच असणार आहे - सतत! शाळेची इमारत दहा वर्षांची होती तेव्हा समोरच्या जागी, जिथे काहीही नव्हतं, थोडी हालचाल सुरु झाली. 'शाळेच्या ठिकाणी हे काय?' अशी बऱ्याच जणांची भावना त्या दिवसात होती. पण शेवटी थोडा संघर्ष करून दामोदर हॉटेल ह्या इमारतीने आपले अस्तित्व मिळवले.
माझे प्रश्न असे आहेत :
१. बाणेर-बालेवाडी- औंध भागात एसएस्सी अभ्यासक्रमाच्या चांगल्या शाळा कुठल्या ?
२.बालेवाडीत भारती विद्यापीठ स्कूल आहे. इंग्लिश मिडियम सीबीएसई आहे असे वाटते. ती चांगली नाहीये का ? मी बालेवाडीत असतानाही आमच्या सोसायटीत मी वर दिलेल्या शाळांचीच चर्चा असायची. भारती विद्यापीठ बद्दल कुणी बोलत नसे.
३. वरील दिलेल्या लिस्टव्यतिरिक्त अजून काही सीबीएसई / आयसीएसई शाळा आहेत का ज्या माझ्या नजरेतून सुटल्या आहेत ?
४. इथल्या कुणाची मुलं त्या शाळांत जात असतील तर त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील.
शाळेत जायला कंटाळा येतो
शाळा देते त्रास
पण मात्र शाळेत असतात
आपले काही क्षण खुप खास
शाळेचा आज पहिला दिवस
खुप काही आहे मनात
उठले मी सकाळी तेव्हा
फुलपाखरू पुटपुटले कानात
उठ लवकर माझ्यासारखे
बघ बघू माझी शाळा
बिनभिंतींची आहे आणि
नाही खडू, नाही फळा
होतो मी एक अळी
जेव्हा जायला लागलो शाळेत
आता फुलपाखरू बनुन फिरतो
मी त्या सुंदर बागेत
मग कावळेदादा मला
दाखवू लागले काही
मी पण होतो लहान तेव्हा
कधीच रडायचो नाही
भित्रट, घाबरट म्हणायचे सगळे
चिडवायचे ते मला
पण आता हुशार झालो मी
कारण शिकलो मी शाळा
मग भेटला सुर्यमामा
चालला होता शाळेत
म्हणे उशीर झाला मला
पुन्हा भरेल का तो वर्ग ?
पुन्हा भरेल का ती शाळा ?
पुन्हा गाणे म्हणायला
आतूर असेल का माझा गळा ?
होतील का परत ती भांडणे ?
शाळेच्या कँटीन मधे
येईल का परत माझे नाव
पहिल्या नंबरामधे ?
असतील का ती चित्रे
तेव्हा रंगवलेली ?
कळेल का त्यातली चूक
नकळत झालेली ?
ओरडतील का परत टिचर ?
चिडवाचिडवी करताना
खेचेल का कुणी माझी वेणी
रस्त्यावरून जाताना ?
देईल का आता आई
नवी बॅग, नवा पेन ?
येईल का परत बनवता
पुठ्ठ्यांची ती छोटीशी ट्रेन ?
खोटं-नाटं कारण सांगून
दांडी मारायचे पहिले
पण आता तर कायमची सुट्टीच झालीये
कारण मुलं मोठी नाही, पण वर्ग लहान झालेत !
- मृण्मयी शैलेंद्र
नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्या दृष्टीहीनांसाठी तिसर्या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!