लेखन उपक्रम २ - किंमत - प्राचीन
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
त्याची चिडचिड बघून तिनं विचारलं,
" काय झालं? "
" सगळ्याचाच वैताग आलाय. लोक किती विचित्र वागतात! कधी आपल्याला किंमत देणार, तर कधी आपण त्यांच्या दृष्टीने मातीमोल असणार. "
" त्यांचं आपल्याशिवाय फारसं अडलेलं नाही, याचं वैषम्य वाटतंय का?"
तिनं नेमकं वर्मावर बोट ठेवल्यानं तो आणखीनच लाल झाला.
" असंच असतंय बाबा.. आयुष्यात चढउतार यायचेच. कधी आपला
भाव वधारला, तर उतूमातू नये नि कवडीमोल ठरलो तरी त्रासू नये.