वारी
दिंडी आली हाकारत
चला जाऊ पंढरीसी
ओढ सरेना प्रपंची
मनी एक कासाविशी
तुका ज्ञानाच्या गजरी
शांत होऊनी काहिली
घोर लागतो जीवाला
कधी भेटेल माऊली
वाचे उच्चार नामाचा
रुप विठूचे नयनी
आर्त होऊनी हाकारी
मज भेटवा जननी
दिंडी निघे पंढरीस
सल ह्रदयास चिरी
विठूमाई पालविते
उभारोनी दोही करी
श्वास श्वास ओवूनिया
नाम ठसूदे अंतरी
ध्यास विठूचा सतत
क्षणोक्षणी साधो वारी...
....................................
विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल
ज्ञानोबा माऊली तुकाराम
![1437826144-2467.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u66462/1437826144-2467.jpg)
समतेची वारी पंढरीच्या द्वारी
तिची वारी
पहाट फटफटायच्या आधीच धुरपानं तानीला ठवलं “ताने, उठ लवकर. वारीत जायचयं.” तानी अजुनच जास्त गोधडीत गुरफटली. कालच्या भुरभुर पावसानं चांगलाच गारवा आला होता. फाटक्या गोधडीतून अंग बाहेर निघत नव्हतं.
सगुण ब्रह्म
वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा
भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने
धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत
चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....
रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!
रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…
गोत्र माझे भागवत
आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला
दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास
भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश
तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून
विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात
वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....
पांडुरंगाची वारीला जाण्यासाठी बरीच जुळवा जुळव चालू होती. कारण त्याने ठरवलं होतं की काहीही करुन यावर्षी वारीला जायचच आणि पांडूरंगाचं दर्शन घ्यायचच. वारीला जाणारी मोठी दिंडी दरवर्षी गावातून निघायची. आपापला लवाजमा घेऊन, पूढच्या प्रवासाचा शिधा घेऊन गावातून बरेच वारकरी वारीला दरवर्षी हमखास जायचे. छोटी- मोठी सगळी माणसं त्या दिंडीत सहभागी व्हायची. गेल्या वर्षीच पांडूने पडक्या वाड्याच्या मागे असलेल्या विठ्ठलाच्या देवळात शप्पथ घेतली होती की मी पंढरपूरला येऊन तुझी भेट घेईन. त्या विठ्ठलाची आणि पांडूची खास दोस्ती होती. अगदी काहीही झालं तरी पांडू रोज न चूकता त्या देवळात जायचा. त्याची पूजा करायचा.
महाराष्ट्रातल्या तमाम वारकर्यांची पावले आज पंढरपूरच्या दिशेने वळलेली आहेत. पावसाचा जोर जरी म्हणावा तसा नसला तरी वारकर्यांचा जोश मात्र नेहमीप्रमाणेच मुसळधार आहे. मिडियाच्या कृपेने घर बसल्या सगळी क्षणचित्रे पहायला मिळताहेत. वारीला न जाता वारीचा आनंद लुटता येतोय. घाटातली अभुतपुर्व गर्दी, रिंगण सोहळा, दिंडी.... वारी पहाणे हाही एक अविस्मरणीय सोहळाच.