कधी स्वच्छंद नदीसारखे
कधी गंभीर डोहासारखे
कधी पारदर्शी निर्झरासारखे
कधी अथांग सागरासारखे
कधी नवीन पालवीसारखे
कधी शिशिरातील वृक्षांसारखे
कधी तेजस्वी सूर्यासारखे
कधी मिट्ट काळोखासारखे
कधी वाळूच्या कणाएवढे
कधी अनंत आकाशाएवढे
कधी मायेची उब देणारे
कधी आधारस्तंभासारखे
कधी अगदी माझ्यासारखे
कधी मलाच परके करणारे
कधी मनात गर्दी करणारे
कधी मला एकटे सोडणारे
कधी शब्दांनी अलंकारिलेले
कधी निराकार जाणीवेसारखे
कधी होतील अर्पण समिधेसारखे
तादात्म्य ईश्वराशी पावणारे?
प्रथम इथे
दुसरा किस्सा क्रमांक २
छोटासाच किस्सा आहे, याचा संबंध शिर्षकाशी असल्याने एकाच लेखाअंतर्गत डकवले आहे परंतु पहिल्या किस्श्याशी याचा थेट संबंध जोडू नका.
डिसक्लेमर पुन्हा देतो - नाव-संदर्भ बदललेले आहेत.
मी नाही बोलत माझे विचार बोलतात
मी नाही बोलत माझे विचार बोलतात
माझ्या जगण्याला नेहमी माझ्या विचारांची जोड असते
विचारांची जोड असते !!!
तुझी साथ वाटे मला शाश्वताची तुझ्यावर मला हक्कही वाटतो
तसे ह्या जगाशी जुळवले कितीही तरी रोज हटकून मी भांडतो
क्वचित एकदा तू असा मूर्त होऊन येतोस, होतोस अक्षरफुले
तुझा हाच दुर्दम्य विश्वास माझ्यात आशा उद्याची बनुन किलबिले
छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी
विचारा, तुझ्यावर अजुन ठाम मी तू नको धीर सोडूस इतक्यात रे
प्रवासास आरंभ केला कधीचा नको थांबणे व्यर्थ अर्ध्यात रे
..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी माबो वर नव्हतो..............
विचारांचे चक्र आणि चक्राकार विचार कधीकधी डोके भंडावून सोडतात. हे सर्व का कशासाठी? कोणासाठी? कधीपर्यंत? चिचार आणि भाषा खरे तर आपणच तयार केलेली, आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेता यावा आणि त्याप्रमाणे आपल्याला क्रिया करता यावी, आपले निर्णय घेता यावेत, सर्वांशी संवाद साधता यावा आणि तोही दर्जेदार, म्हणून. पण कधीकधी आजूबाजूला इतके काही घडत असतं- गोष्टी, बातम्या , शब्द ह्यांचा भडीमार होत असतो को त्यातले अचूकपणे काय घ्यावे आणि काय सोडावे समजत नाही.
खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा!
गेल्या दोन महिन्यात घडलेल्या असंख्य घडामोडी आणि धावपळीनंतर आत्ता कुठे तिला जरा शांतता, फुरसत मिळाली होती. म्हणजे अजून तसा प्रवास संपलेला नाहीच आहे. पण तरीही सकाळपासून रेल्वेचा प्रवास, मग एअरपोर्टवर सिक्युरिटी वगैरे नाटकं संपवून पॅरिसच्या 'चार्ल्स डे गॉल' विमानतळावर ती पुढच्या विमानाची वाट पाहात थांबली होती. दगदग, गडबड होती तरी हातात घेतलेली सगळी काम यथायोग्य पार पडली या विचारानीच तिला शांत वाटत होतं. असं दमून-भागून शांत, स्वस्थ झाली की कायम बसल्या बसल्या 'काय काय घडून गेलं' याची उजळणी, त्यावर विचार करायची तिची नेहेमीची सवय.
रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.