पुन्हा पुन्हा का तुला आठवते
वेडे मन हे का बावरते..?
हुरहूरते का तुला पाहण्या
परी बोलण्या का घाबरते..?
राती काळ्या स्वप्न रंगीते
स्वप्नातून मग तुला पाहते
दिवसा उघड्या डोळ्यांनी ते
तुझ्याच का स्वप्नात राहते..?
पुन्हा पुन्हा का तुझ्या घराचे
गल्लीतून हा घाली फेरे..?
सदा तुला हृदयात भरण्या
हृदयाची का उघडी दारे..?
स्पर्श नको परी पास हवा तू!
जीव नको परी श्वास हवा तू!
असा कसा भाव आहे हा..?
ध्येय नको परी ध्यास हवा तू....!
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा (खसखस) दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
"हट .. भें s s चो"
"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं
मी फक्त नकारार्थी मान डोलावली.
"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना
"हट .. भें s s चो"
"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं
मी फक्त नकारार्थी मान डोलावली.
"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना
सकाळी फिरायला जातो ते महात्मा सोसायटीजवळ असलेल्या डीपी रोडपर्यंत. तिथे रस्त्यावर दामलेकाकांची एक मोफत व ओपन लायब्ररी आहे. लोक पुस्तके नेतात व आणतात. अनेकांनी पुस्तके भेटही दिली आहेत. काही जण उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. दामले काका जगन्मित्र व नर्मदा परिक्रमा केलेले. त्यामुळे ग्रंथालायचे नाव ही नर्मदे हर! मी थोडावेळ गप्पा मारायचो. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ग्रंथालयाला भेट दिले.मग गप्पांमधून त्यांना व तेथील स्वयंसेवकांना, माझ्या व्यत्किमत्वाचा परिचय होत गेला. शिरिष नावाचे एक गृहस्थ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे.पण त्यांच्या बोलण्यात मला अस्वस्थता जाणवायची.
वेदनादायी क्षणांना सण म्हणावे लागले
सलत्या जखमांस हसुनी व्रण म्हणावे लागले ॥
विखरून गेले दान जे झोळीत होते घेतले
राहिल्या काही कणांना धन म्हणावे लागले ॥
मानले मी रूख त्यांच्या सावल्या करपून गेल्या
पेटत्या उरल्या उन्हाला वन म्हणावे लागले ॥
केला तयांनी यत्न वेडा मूर्त ही घडवावयाचा
राहिल्या दगडास मजला मन म्हणावे लागले॥
द्यायचे आता न मजला राहिले कोणास काही
राहिल्या हास्यास तरिही ऋण म्हणावे लागले ॥
©निखिल मोडक
बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!
......
.
...
काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XWw...) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन.
अकांशाचा भुंगा पोखरी मनास
नश्वर असे सर्वकाही आठवी मनास
परी चालताना मार्गावरून सत्याच्या
खेचेल गोडी ऐहिक सुखाची मनास
वासना उठाठेव करिती मनास
उरेल का सत्य चिंता जाळसी मनास
मनाचेच हाल होती मनाच्याच हातून
दुसरा कोण विरोध करिसी मनास
अस्मितेचा मृत्यू रडवी मनास
दुःख काय असते जाणवी मनास
"मी" पणा सोडाया मन धाजावत नसे
तेव्हा मिथ्या अहंकार फासी देई मनास
काय काय करावे, संभ्रम आडवी मनास
गृहीत धरले सारे, चूक आकळी मनास
नश्वर वस्तूंचा मोहापाश सुटणार नाही
सत्य जाणून गल्यानी मारे मिठी मनास
- अक्षय समेळ