तुझे कुठेतरी गुपचुप उद्योग चाललेले असतात.
मी तुला हळूच येऊन पकडते आणि मोठ्ठा पापा घेऊन म्हणते , "अरे सशा, तुला एक खूप महत्त्वाचं सांगायचं होतं रे.." तुझे मोठे डोळे अजूनच मोठे करत तू म्हणतोस,"काय ग आई?" "अरे , तू मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतोस ..." हे ऐकलं की तू खुश होतोस. तुला माहीत असतं की आई महत्त्वाचं असं काय सांगणार आहे . माझं हे वाक्यही तुला माहीत असतं. पण तरीही तुला ते ऐकायला फार आवडतं आणि मला तुला ते सांगायला...!
भल्या पहाटे गावाबाहेरची टेकडी चढताना टेकडीशी फारकत घेऊन वळलेल्या पाऊलवाटेने भाविक घाईघाईने चाललेले दिसतात. अजून फटफटलेलं नसतं. वाट पायाखालची असते. थंड वारं चित्तवृत्ती उल्हसित करत असतं. टेकडीच्या त्या बाजूला आणखी एक उंचवटा आहे. त्यावरचं जुनं मंदीर अंधारातच जागं झालेलं असतं.
नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.
मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
इंग्रजीतून सातत्याने लिहिणारे भारतीय लेखक म्हटले की दोन पिढ्यांमागे अगदीच एका हाताची बोटे पुरायची मोजायला. मुल्कराज आनंद, मनोहर माळगांवकर, आर के नारायण, झाले. फारतर खुशवंत सिंह आणि कमला मार्कंडेय.
ही यादी पूर्णतः स्मरणाधारित असल्याने एखादे ताकदीचे नाव सुटले असेल तर आधीच 'चुभूदेघे' म्हणतो.
आणि एखादे(च) पुस्तक लिहून प्रसिद्ध झालेले कुणी असतील तर ते माझ्या रडारवर नाहीत हेही नोंदून ठेवतो.