सकाळ झाली वाटत? बाबाने अंथरुणातून गणूला उचलले, खळखळ त्याचे तोंड धुतले, कपडे सारखे केले आणि त्याच्या हातात एक बिस्कीट कोंबले. गणू अजून पेंगतच होता. बाबाने स्वतःचे आवरले आणि गणूला खांद्यावर घेउन तो शेताकडे निघाला. बाबाच्या खांद्यावर गणू आपली झोप पूर्ण करून घेत होता. पायवाटेने बाबा निघाला आणि पक्षांच्या किलबिलाटाने गणूला प्रसन्न जाग आली. त्याने मान वळवून पक्षांच्या दिशेने पाहायला सुरुवात केली. पक्षांना पाहून त्याला खूपच छान वाटले आणि बाबाच्या खांद्यावर तो नीट सरकून बसला. मध्येच एक पक्षांची रांग झाडांमधून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने उडाली आणि गणूची मान त्या दिशेने कलली.
जून २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके
ऑफिसमधे येऊन अर्धा तास पण झाला नव्हता पण कंटाळा शुक्रवार संध्याकाळ इतका आला होता. जुलैचा महिना त्यात बाहेर तूफान पाऊस पडत होता, त्यामुळे ट्रेन उशीरा धावत होत्या. मध्य रेल्वे तर कधीही बंद पाडायच्या मार्गावर होती. आज ऑफिस अगदी सुनसान होते. सीक्युरीटी गार्ड बसल्याबसल्या चक्क पेंगत होता. बहुधा ऑफिसमधे मीच एकटी वेळेत आले होते. दुसरे कुणीच दिसेना. मेलबॉक्स चेक करून बघितला तर काही नविन मेल नव्हतं. मग उगाच फेसबूक वगैरे उघडून बसले. पण वेळ जाता जात नव्हता. तसं आजच्या दिवसाभराच्या कामाचं माझं काहीच जास्त टारगेट नव्हतं.
२२ जुलैला गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे प्रकाशन "शरद जोशी" यांच्या हस्ते.
काल ९ जुलै ~ हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल लिहिताना वाचताना चर्चा करताना आपण हरवून जातो अशा दोन कलाकारांचा हा जन्मदिवस. ज्यांची नावे उच्चारताच सर्वच स्तरावरील रसिकप्रेमींच्या मनी ज्यांच्याबद्दल 'अपनापन' भावना निर्माण होतेच होते, ते दोघे - गुरुदत्त आणि संजीवकुमार.
ए बाहेर बघ ना रे! आजही तो आलाच... जुन्या आठवणी म्हणलं की त्याचं येणं स्वाभाविकच म्हणा. कसा मोक्याच्या क्षणी येतो ना हा द्वाड!
आठव.. कॉलेजचा पहिला दिवस... बावरलेली मी आणि तितकीच धिटाई अंगात भरलेला तू. बसची वाट पाहत मी बस स्टँडला उभी होते आणि इतक्यात तू जवळ आलास. "कॉलेजचा पहिला दिवस वाट्टं" कसल्या आगावपणे विचारलेलस ना तू? आधीच बावरलेली मी त्यात अजुन गडबडले. हो म्हणे पर्यंत तुझा पुढचा प्रश्न "कुठलं कॉलेज?" आणि कॉलेजचं नाव ऐकताच "हायला तू माझ्याच कॉलेजातेस की..चल ऑटो करुन जाऊ" हा तू दिलेला आदेश!
कालचा प्रसंग. म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर "भगवान का लाख लाख शुक्र है के अनहोनी टल गई" प्रकारातला....
काल लेक शाळेतून आला. शाळेत निघताना टापटिपीत निघायचं आणि येताना मात्र शिमग्याच्या सोंगासारखं यायचं, हे रोजचंच झालंय.
जाताना आत खोचलेला शर्ट परत येईपर्यंत अर्धा बाहेर, शर्टवर कमीत कमी दोन (आणि जास्तीत जास्त कितीही !) डाग, दिवसाआड एका नवीन जागी खरचटल्याच्या खुणा, मस्ती करून करून थकलेला पण तरीही प्रफुल्लित चेहरा, हातात एखादं छोटंसं फूल किंवा चित्र आणि कधी एकदा घडलेलं रामायण आईला सांगतो असा आविर्भाव....
कालही तसंच.
आल्या-आल्याच जाहीर केलं,
मे २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके
रेषाटन आठवणींचा प्रवास - शि.द.फडणीस
आमच्या आयुष्यातील काही आठवणी : लेखिका - रमाबाई रानडे
चूक
==================================================
<<< मागील भाग
दुपारी दोनच्या सुमारास ढेरे दोन पोरांना घेऊन आला. तो पोलीस चौकीत येताच 'साहेब ' अशी हाक मारली.
"ए गपे, साहेब डिस्टर्ब करू नको म्हणालेत. बस जरा वेळ. ", मिसाळ्याने ढेरेला सांगितले.
ढेरे त्या दोन पोरांना बाकड्यावर बसवून आपण शेजारच्या स्टूलवर बसला.
" काय रे ढेरे, ही पोर कुठून उचलली ? यांनी काय केलंय ? "
" अरे यांनी काही केलं नाहीये. सकाळी आपण - ", तो बोलायचं थांबला आणि उभा राहिला.
.
स्कीम..
=====
१
" गुड इव्हिनिंग सर, मी मिशिकांत टोक"
" या या टोक. बरोबर सहा वाजता आलात "
" कंपनीची सक्त ताकीद आहे सर, वेळ पाळायची "
" गुड ! काही त्रास तर नाही ना झाला ?"
" छे हो ! त्रास कसला...अजिबात नाही "
" घर सापडलं ?"
" हो सापडलं. थोडंस शोधावं लागलं पण "
" अरेरे ! शोधावं लागलं म्हणताय ? त्रास झाला नाही का, माझ्यामुळे ! "
" स्सर..तुम्ही लाजवताय ! .. थोडंसं शोधावं लागतंच ! त्रास कसला त्यात. "
" जिना चढून आला असाल ना ? लिफ्ट बंद आहे म्हणून विचारलं"
" त्यात काय मोठंसं ! सवय असते आम्हाला "