शेती

लागेल थोडे तेल धगास आता

Submitted by डॉ. बंडोपंत on 18 May, 2013 - 05:58

वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता

पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता

ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता

मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता

गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता

चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता

(मार्गदर्शन अपेक्षीत)

तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते

Submitted by तिलकधारी on 1 May, 2013 - 07:55

तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते
गझलांवरती दंगल होते, मन माझे अन् गांगरते!!

डू ऐड्यांचे मुडदे पडती, कत्तल होते ऐड्यांची
बिळात लपुनी घाबरलेली मदत समीती हंबरते

हवा वादळी बघून पळती दुसर्‍या पानावर सारे ;
कधी नव्हे ते जनसंख्येने दुसरे पानहि गुदमरते

मुख्य फरक पडतो गप्पांच्या पानांवरच्या पडिकांना
गझलांवरच्या गप्पांखाली त्यांची चिवचिव चेंगरते

तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
आत्मघातकी पथक बाँबच्या पायघड्याही अंथरते

थिजलेल्या काळास कुणाची नजर न लागो म्हणून बघ....

त्यांचाच जीव घे तू ..

Submitted by अभय आर्वीकर on 21 April, 2013 - 01:09

त्यांचाच जीव घे तू .....

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता

शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता

संयुक्ता मुलाखत : अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान, नाशिक

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 March, 2013 - 09:54

आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.

दुष्काळ कविता

Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 08:17

महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीवर मी लिहिले आहे.....
-----------------------------------------------------------------------------------------------------
तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा
हलत लांब पळताहे थांबवा त्या मृगजळा
शेतात पिक ते झाले की सापळा
गर्द हिरव्या निवडुंगाचे काटे करती वाकुल्या
अवचित कधी झाकोळून जाई लागे वेडी आशा
परी वाहून नेई घन ते सारे पवन दुसऱ्या देशा
कडाड कड घनघोर घन
शीतल सुंदर आता वन
थेंब भिजविती कणा मृदेच्या
वाफा उठती निश्वासाच्या
झिरपते भेगा - भेगातून पाणी
क्षणात होई पुन्हा एकसंध धरणी

दुष्काळ

Submitted by शाबुत on 8 March, 2013 - 23:56

आजच्या घडीला मराठवाड्यात आणि विदर्भच्या काही भागात दुष्काळ पडलेला आहे....... याच्या बातम्या रोजच टि.व्ही. वर दाखविल्या जातात.........आपल्याला त्या बातम्या पाहुनही मन खिन्न होतं.... तेव्हाच त्या वातावरणात जगत असतील त्यांची काय अवस्था असेल?.... खरं तर खेड्यातला दुष्काळ हा फारच भयान असतो.... पण दुष्काळ हा यावर्षीच पडला असही नाही..... तो चार-पाच वर्षात महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला भेट देतो....... मग अशा दुष्काळात कसं जगायचं हे गरिब जगतेला माहिती असतं.....

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

Submitted by अभय आर्वीकर on 26 February, 2013 - 18:44

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

नमस्कार मित्रहो,

आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.

विषय: 

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

Submitted by अभय आर्वीकर on 9 January, 2013 - 06:17

विशेष लेख - लोकसत्ता

मित्राच्या शेतात खिचडी पार्टी. (पिंपळगाव, नांदेड)

Submitted by ssaurabh2008 on 6 January, 2013 - 03:58

काल मित्राच्या शेतामध्ये खिचडी पार्टी केली. Happy
त्यादरम्यान काढलेल्या काही फोटो.

१)

२)

३)

४)

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

Submitted by अभय आर्वीकर on 11 December, 2012 - 10:08

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!
(पुण्यनगरीच्या सौजन्याने)

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शेती