वसंतोत्सव
ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव.
१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.
ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव.
१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
कालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.
येथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.
सुंदर, अप्रतिम अनुभूती.
वनस्पतीचे संरक्षक कवच -पिवळा रंग
उन्हाळा संपता संपता मी सकाळी नियमित फिरणं सुरु केलं आणि साहजिकच निसर्गाचं निरीक्षण नित्यनेमाने होऊ लागलं. अलीकडे दिवाळी निमित्त बाहेरगावीही जाणं झालं. जाता येताना निसर्गाची मजा लुटताना इतके दिवस पाहिल्याने एक निरीक्षण मनात सारखं घिरट्या घालू लागलं , की एकूणच निसर्गात पिवळ्या रंगाची रेलचेल दिसते आहे.
सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता.