माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्या सोबत असायच्या. मी बकर्या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.
पुणे अफाट, बेशिस्त आणि अनियंत्रित वाढतेय. आताच्या पुणेकरांना त्याचं विशेष वाटत नाही.
पण ज्यांनी जुनं पुणं अनुभवलं आहे त्यांना पुण्याचं हे रूप झेपत नाही. काहींना बदल हा नैसर्गिक आहे असे वाटते. अर्थात शहरात होणारे बदल नैसर्गिक कसे असू शकतात असा प्रश्न लगेचच विचारला जाऊ शकतो.
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/84992
गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.
“अमेरिका सोडून उर्वरित जगाचा वीज वापर समजा माझ्या गुडघ्यापर्यंत असेल, तर एकट्या अमेरिकेचा वीज वापर माझ्या कमरेपर्यंत म्हणता येईल. त्यात राज्य म्हणून टेक्सास बघाल तर खांद्यापर्यंत आणि आपल्या ऑस्टिनविषयी बोलायचे झाले तर डोक्यावरून…”
सुखाची सरकारी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायांत पडण्यांत (हा शद्ब दोन्ही अर्थांनी घ्यावा) एक मजा (कम नशा) असते. स्वातंत्र्य आणि खूप काही शिकायला मिळतं. निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यांचे चाललेले अगणित उद्योग, जगतातल्या घडामोडी असं काय काय ऐकायला बघायला मिळतं. शिवाय आपणही त्या घडामोडींचा एक भाग सहज बनत जातो.
नमस्कार!
आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते. जागतिक तापमानवाढीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची आम्हांला विशेष काळजी वाटते.
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही.
आपल्या रोजच्या रुटीन मध्ये, घाई गडबडीत अनेक कचऱ्यात टाकण्या योग्य गोष्टी निर्माण होतात.त्यांच्या बद्दल हा धागा.
चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.
नव्या संसद भवनात आमच्या विश्वगुरुंनी महिलाआरक्षण नावाच एक ऐतेहासिक विधेयक आणल कारण निवडणूक जवळ आली याच विधेयकाला काही काळापुर्वी भाजपचे एक बलशाली नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी विरोध केला होता पण तो विषय नाही मतेमतांतरे लोकशाहीत असणारच.एव्हढा गाजावाजा करत आणलेल्या या विधेयकाला कुणीही (फक्त दोन खासदार वगळता)विरोध न करता पाठिंबा देत हे विधेयक पास झाले .