"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"
.
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला.
भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल.
मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती.
भा. रा. तांबेंजींचे 'नववधु प्रिया' गाणे (कविता) ऐकत होतो की ज्याचा सरळ अर्थ अगदी साधा वाटला तरी त्याचा खरा अर्थ वेगळाच व उच्च पातळीचा आहे.
त्याचळेस कुमारजींच्या निर्गुणी भजनातील ' कौन ठगवा नगरिया...' ह्याच्या दिव्यार्थात आणी वरच्या गीत / कवितेतला अर्थ जवळपास सारखा आहे असे मला वाटले.
अशी अजून काही उदहरणे असल्यास जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!
असेच एक कबिराचे माझे आवडते भजन
https://www.youtube.com/watch?v=0vzS1Sdwccs
माझे स्थित्यंतर... केवढा व्यापक विषय आहे हा.. माझ्यासाठीच कशाला, तुम्हा आम्हा सर्वांसाठीच हा व्यापक विषय असेल. लिहायला घेतले तर जवळपास आत्मचरीत्र तयार होईल. कारण बदल हेच तर आयुष्य आहे. माणूस बदलायचा थांबला तर तो तिथेच थिजला आणि संपला. तसेही कोणीतरी म्हटलेच आहे (बहुतेक संयोजकांनीच) की जगात सगळ्यात काही शाश्वत, कायमस्वरुपी असेल तर तो म्हणजे बदल!
मागे वळून पाहताना दोनचार चांगले बदल जाणवतात ज्यांनी माझ्या व्यक्तीमत्वात उल्लेखनीय बदल घडवला आणि आयुष्यावर फार मोठा फरक पाडला आहे.
-------------------------------------------
संध्याकाळचे ६ वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेला होता. दिवसभर माळरानावर चारा चरून गुरे ढोरे आपल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती, त्यांचा मागे गुराखी सुद्धा त्यांचावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकामटेकडी म्हातारी उगाचच सुतकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटस सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर तशी पाटी सुद्धा लटकत होती, जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपत चोरगे हा सरकारी खात्यातील माणूस गावातील २-३ ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसलीतरी चर्चा करत बसलेला होता.
पहिल्याच दिवशी बघितल रस्त्याला केव्हढ्या गाड्या होत्या,पण सगळ्या ठराविक गतीने, एकच लेन मधून चाललेल्या, व्यवस्थित सिग्नलला थांबत होत्या, कोणीही हॉर्न वाजवत नव्हतं, एव्हढ्या गाड्या असून डोळ्यांना अजिबात धूर दिसत नव्हता. इतकं आश्चर्य वाटलं.
दुसऱ्या दिवशी चालतच बाहेर पडले, मला आधीच सांगून ठेवलेलं की पादचाऱ्यांसाठी वेगळा सिग्नल असतो, ते बटण दाबून उभ राहायचं आणि आपल्यासाठी वॉकिंग सिग्नल आला की मगच रस्ता क्रॉस करायचा. अगदी पोरटोरांपासून वृद्धांपर्यंत सगळे असेच रस्ता क्रॉस करताना दिसले. आता ह्या लोकांच्या वाहन शिस्तीचे कौतुक वाढतच चालले.
लग्नाच्या नवलाईत होरपळणारी वर्षा आतुरतेनं मान्सूनची वाट पहात होती. वाटायचं, ऋतू बदलला की माणसं बदलतील! पावसानं मात्र वर्दी दिली ती सरत्या आषाढात! आठवड्यातभरात हिरवाई लेऊन सृष्टी सुखावली.
उत्साहात तो रांगेत उभा होता. 'गुलमर्गची केबल कार राईड'.... या खोल दरीवरुन पलिकडे बर्फाच्छादित डोंगरावर पोचायचं.... भारीच ! एका गोंडोलात ७ जण या हिशोबाने पुढच्या ४ जणांच्या कुटुंबासोबत आपला नंबर येणार, येय !!
गोंडोला येऊन पोचली आणि अचानकच मागच्या तिघांनी याला विनंती केली की दादा आम्ही तिघे एकत्र आहोत तर आम्हाला या चौघांसोबत जाऊ दे प्लीज तुम्ही मागच्या गोंडोलातून येता का? याने हो, नाही म्हणेपर्यंत ते तिघे गोंडोलात घुसले आणि राईड सुरुही झाली.
हा मागे चरफडत राहिला शिव्या घालत आणि वाट बघत.........
इतक्यात.....
खळ्ळ्ळखाट.....
त्याच्या हातात जादू होती. कॅनव्हास रंगत होता. डोंगर, दरी, रस्ता, नदी.... आणि कावळा.
अरेss आताच तर रेखाटला होता.. गेला कुठे???
अचानक खिडकीवर सणकन् काहीतरी आदळल्याचा आवाज आला. एक कावळा उडत येऊन काचेवर धडकला होता.
त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. समोर तोच डोंगर! जो त्याने लहानपणी जाळला होता. कोणाचाही त्यावर विश्वास नव्हता.
बघताबघता त्या डोंगराने पेट घेतला. तो घाबरला. पण काय होतेय हे त्याच्या लक्षात आले.
कल्पनाशक्तीचा आविष्कार!
प्रसन्न सकाळ आहे. सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलाचा वास मनाला कसा प्रफुल्लित करतोय. कच्च्या रस्त्यावरून मी जीप हाकत या डोंगरावरच्या निरीक्षण केंद्राकडे निघालोय. समोरचा उंच डोंगरमाथा बाष्पाच्या ढगांत गुरफटलाय. मात्र त्या मोहक आवरणाखाली लाव्हाचं धगधगतं स्थंडिल आहे! त्यावरच तर लक्ष ठेवायचंय. मी पोहोचलो की डेव्हिड निघेल.
अचानक जीप थरथरली, जमीन हादरली, आणि गगनभेदी हुंकारानं कानठळ्या बसल्या! शिखर फोडून लाव्हा उसळला. आकाशाची निळाई दगड राखेच्या उंचच उंच मश्रूम ढगांनी झाकोळली.
ज्वालामुखी मातला होता, कालभैरवाचं तांडवच जणु!