आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.
{{ लाईट्स..! कॅमेरा..! साउंड..! "रोलिंग..!"
सीन नंबर १, शॉट-५, टेक-२
"ॲक्शन" }}
नवरा : आगं ते जरा बोगद्याकडच्या मळ्यातली
हीर जरा बांदून घ्यायचीय.. त्येज्यासाटी सोसायटी
काडावी लागंल..! सही कर की जरा हितं..!
बायको : ओ जावा तिकडं. कितींदा सोसायट्या काडायच्या? कोन फेडत बसनार ते पुना ??
मी नाय करत सही..!
नवरा : अगं एवढ्या बारीला कर..! पुना नाय मागत.
एका आदिवासीची जागा दुसऱ्या आदिवासीला घेणेबाबत माहिती हवी आहे...
साधारण जमीन घेणेबाबत नॉर्मल प्रोसेस वकीला मार्फत करता येते, परंतु आदिवासींची जागा आदिवासीला घायची असल्यास काय प्रोसेस आहे? कोणकोणते कागदपत्र असायला हवेत? किती दिवसात ७/१२ वर नवीन नावं registered होतो. साधारण खर्च किती येतो? तुकड्याने हवी असल्यास कोणत्या वर्गातील किती जागा घेता येते? विकणाऱ्याने पैसे घेतल्यानंतर काही फसवणूक करू नये यासाठी कोणकोणती काळजी घ्यायला हवी?
कृपया मार्गदर्शन करावे.
इथून मागे कदाचित प्रत्येक दहा दहा वर्षांच्या टप्प्यावर उभे राहून बघितले तर शेतीतल्या अनेक कामांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले आढळेल. शेतीतल्या अनेक आधुनिक स्वयंचलीत अवजारांनी आधीच्या अवजारांची जागा घेतल्याने, नवनव्या लागवडीच्या पद्धती आल्याने, त्या त्या कामांचे स्वरूप ओघातच बदलून जाते. या नवीन कार्यपद्धतींत नवीन संज्ञा जन्म घेतात आणि त्या यथावकाश रूळतात. यात काही पारंपारीक संज्ञा मागे पडतात. शेतीतल्या अशा नव्या-जुन्या संज्ञांचे संकलन करण्यासाठी हा धागा.
माहिती विचारण्यासाठी / शेअर करण्यासाठी / पडताळून पाहण्यासाठी.
अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं
हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं
काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला
ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला
किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा
बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा
खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा
पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला
पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा
न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा
दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात
उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात
- पाषाणभेद
२४/१०/२०२१
मागच्या लेखात आपण गोचीड कुटुंबाचा इतिहास आणि वंशावळीबाबत माहिती घेतली. या लेखात आपण गोचीडा बद्दलचे गैरसमज आणि नियंत्रणाबद्दल जाणून घेऊया. लोकांमध्ये या कुप्रसिद्ध किड्याबद्दल बरेच गोचीडसमज आहेत. त्यातील तथ्ये जरा जाणून घेऊयात.
सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)
पुणे सिंगापूर पुणे या हिमिमेतील २०००० किलोमीटर प्रवासादरम्यान पर्यावरण आणि शेतीसंबंधीचे अनुभव.
दुचाकीवरून सात देशांची सफर करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांच्या नजरेतून तेथील शेतीचा रोचक आणि रंजक आढावा...