लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
विषय क्रमांक १ - माझी आवडती साहित्य/ चित्रपट/ नाटकातली व्यक्तिरेखा
वाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..
काय वाचताय?कसं आहे?कुठे मिळेल? हे सगळं बोलण्यासाठी..
-परागची संकल्पना..
कृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.
-अॅडमीन
(छ. टि. १: भारतीय कथांनुसार चित्रगुप्त, नारद आणि अत्री ही ब्रह्माची मुलं आहेत.
छ. टि. २: खालील संभाषणातील लोक व घटना खऱ्या आहेत आणि कल्पनांशी त्यांचा काहीही संबंध नाही.)
नारद : नारायण, नारायण! चित्रगुप्ता, तू या लोखंडी गजांच्या पलीकडे काय करतो आहेस?
चित्रगुप्त: काय करणार? मी लोकांवर पाळत ठेवतो तशी कोणीतरी माझ्यावर ठेवली.
ना: अरे पण तू केले तरी काय?
चि: मला जसे सर्व कळते तसे तुलाही कळते, तरी सांगतो, ऐक: मी काम करता-करता डुडलींग करत होतो.
मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।
मन असेही ...मन तसेही
चाल समजण्यासाठी http://youtu.be/wvQlRB-R1Gs या संपर्क स्थळावर जा.
गगन सदृश मन अगम्य । गहन सागराशी साम्य ॥१॥
मन खंबीर खडकासमान । मन अस्थीर वाऱ्यासमान ॥२॥
कधी राग द्वेष वैऱ्यासम । कधी करुणा दया बंधुप्रेम ॥३॥
वाऱ्यासम कधी सुसाट । कधी स्तब्ध नाही कलकलाट ॥४॥
संवेदनशील सुर मन । असुर क्रूर अमानुष मन ॥५॥
मन राम पतित पावन ॥ मन बुद्धीभ्रष्ट रावण ॥६॥
सत्यमेव जयते
भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.
सत्य म्हणजे काय? सत्य भूतकाळात असतं कारण ’एखादी घटना घडली’, हे सत्य ती घटना घडल्यावरच अस्तित्वात येते.
वर्तमानात सत्य घडत असतं. सत्याचा भविष्यकाळाशी काही संबंध नसतो कारण जे घडलंच नाही ते सत्य कसे काय असू शकते?
बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता .
किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ?
आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत .
बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला .
किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार !

हॅरिएट मन्रो
अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले .
चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले .
योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती .
राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले .
योगीराज क्षणात समाधिस्थ झाले .
जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे . तुझ्या दरबारातसुद्धा षडयंत्र शिजत आहे , अनेक लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत ."
राजा हादरला .
यथोचित बिदागी घेऊन योगीराज मार्गस्थ झाले .