ललित

लख्ख..!

Submitted by बागेश्री on 24 July, 2013 - 23:41

अपूर्णतेच्या खिन्नतेने तळमळत,
जागलेल्या रात्री...

चढत्या रात्रीने शहाणपण शिकवलं!
खरं खोट्याची सीमा लख्ख केली...

नवी उमेद श्वासात भरून घेता आली,
खंतावणार्‍या गोष्टींमध्ये अडकून राहिलेला पाय अलगद सोडवता आला..

ह्या खिन्नतेमुळे आलेली डोळ्यांवरची झापड, दूर सारता आली..
जगण्यातले अनेक पैलू, डोळसपणे बघता आले

कुठल्याही भावनांचा डोह आता दुरून पाहता येतो,
त्या भावनांत डुबकी मारून बाहेर आल्यानंतर,
अंगावरचे कपडे निथळेपर्यंतच त्याची ओल टिकते, ही अक्कल आली...

स्वतःहून अशी मारलेली उडी परवडते..
योग्य वेळी बाहेर येण्याचं भान राहतं,

शब्दखुणा: 

दहा रुपयांची नोट

Submitted by vaiju.jd on 19 June, 2013 - 13:38

||श्री||

सहावीत असेन मी! रात्री पपांनी हांक मारली. दहा रुपयांची नोट देत म्हणले, ” उद्या फी भरून टाक शाळेची.’
त्यांच्या समोरच मी माझे दप्तर घेऊन त्यातल्या एका पुस्तकात दप्तरातच ती नोट सरकवून ठेवली.ते पुस्तक शाळेच्या पहिल्या तासाच्या विषयाचे होते म्हणजे लगेचच फी द्यायला बरे!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पपांनी विचारले ,” फी दिलीस का? पावती कुठे आहे?”
“आज आमच्या क्लासटीचर बाई रजेवर होत्या म्हणून फी दिली नाही.” मी
“ठीक आहे. ती नोट मला परत दे. उद्या मी भरून टाकीन.” पपा

विषय: 
शब्दखुणा: 

पिल्लं

Submitted by आरतीसाय on 10 June, 2013 - 02:05

पहिली पिल्ल उणीपुरी २ -३ महिन्याची होत आहेत तोपर्यंतच माऊला परत एका बोक्याने साद घातली आणि ती नादाला लागलीच. थोड्याच दिवसात आधीच्या दोन पिलांना तिने असच सोडून दिल. पिल मोठी झाल्यावर आई त्यांना सोडून देतेच. प्राण्यांचा हा निसर्ग नियमच आहे. एव्हाना पहिली पिल स्व त:च पोट भरण्या इतकी मोठी झाली होती, त्यामुळे मला आणि सायलीला विशेष काही वाटल नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

'दरजा'

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुर्वप्रसिद्धी- 'माहेर' दिवाळी अंक २०११.
इथे माझ्या ब्लॉगवर (रंगीबेरंगीवर) पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख यांचे आभार.

***
***

प्रकार: 
शब्दखुणा: 

गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.

गेट क्लोजर

Submitted by दाद on 11 October, 2012 - 20:28

गेट क्लोजर...
काय फंडा आहे...

नक्की कशा कशावर कंट्रोल आहे आपला म्हणायचा... म्हणून गेट क्लोजर?
कधीतरी अख्खं आयुष्यच झपाटून टाकणारं, काहीतरी गवसतं.... आयुष्यात आल्याचं कळतं. आपलाच एक भाग बनून जातं. त्याच्याविना आयुष्यं अधुरं, अपुरं वाटेल असं काहीतरी. त्याविना दु:खं अधिक गहिरं अन आनंदही कोमेजलेला असतो. त्याच्या मनातलं हसू आपल्या जिवणीवर झुळझुळतं, त्याची काळजी आपल्या काळजाचं पाणी होऊन भळभळते.... अन तिथं ओघळल्या सरीनं आपलं जग चिंब होतं.

शब्दखुणा: 

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

Pages

Subscribe to RSS - ललित