मला लिहायला आवडतं पण……
नवीन लिहिताना पहिल्यापासून भीती वाटते…आता कधीकधी वाटतं ती वाढत चाललीये...कारण लिहिण्यासारखं आता खूप काही आहे माझ्याकडं !
लिहायला बसण्याची वेळ माझी कधीच नक्की नसते...अजूनही...कितीही शिस्त वगैरे लावायचं ठरवलं तरीही अजुनपण काहीतरी खरंच सुचल्याशिवाय आणि लिहावंसं वाटल्याशिवाय लिहिलंच जातं नाही...कधी पटपट सुचत..कधी थोडंफारच सुचत आणि ते लिहून झालं कि तिथंच अडकतो...मधेच कुठंतरी लोंबकळल्यासारखी अवस्था असते... आधी जे लिहिलेलं असतं त्याच कौतुक होतं पण परत काहीच लिहायला,किंवा 'पूर्ण' लिहायला जमलेलं नसतं

अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित "फिस्टफूल ओफ डॉलर्स". पुढे ओळीने "फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर" आणि "द गुड, द बॅड अँड द अग्ली" हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना डावलून पुढे जाताच येणार नाही.
वास्तविक तीने जायला हवं होतं, पण ती गेली नाही.
मी इतकं तुसडेपणाने ‘हो’ म्हणूनदेखील ती न जाता निमुटपणे माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसली. आणि टूकूर-टूकूर आपली क्लासरुम न्याहाळू लागली. कधी प्रॅक्टीस करणार्यांकडे तर कधी घरी जाणार्या स्टुडंटकडे एवढंसं तोंड करुन बघू लागली. मध्येच समोर बसलेल्या मुलामुलींच्या थट्टा मस्करीकडे बघून स्वत:शीच जणू केविलवाणी हसू लागली. तिच्या त्या प्रकाराकडे बघून मला कसंसंच झालं. प्रॅक्टीकलवरचं लक्षच उडालं आणि पुन्हा एकदा आमच्या मनाने कच खाल्ली!
मुलींचा माझ्याशी ‘क्रश’ म्हणून जास्त असा संबंध आला नाही. आला तो अगदीच मोजक्या मुलींच्या बाबतीत आला. तुल्लू ही त्यातलीच एक. दुसरी- जेव्हा मी ‘एफ.वाय.जे.सी’ च्या सुट्टीत बोरिवलीला सेल्स एजेंट म्हणून काम करत होतो तेव्हाचा.
काही कामानिमित्त गोरेगावला गेलेलो असताना रात्री परतायला उशीर झाला. म्हणजे जवळजवळ अकराच वाजले होते. त्यावेळी एक मुलगी स्टेशनवर आली होती. आता तो प्लॅटफॉर्म, जागा, ठिकाण, मला काही-काही आठवत नाही. आठवतात ते फक्त तीचे डोळे!
वर्ष संपत आलं होतं. एग्झामच्या प्रिपरेशनचं ओझं डोक्यावर पडायला लागलं होतं. आमची नोट्स पुर्ण करायची धडपड चालू झाली होती. त्यात इकोचे प्रोजेक्ट डोकं खात होतं. वेळेत पुर्ण केलं तर ठीक. नाहीतर त्याचे मार्क्स कट! त्यामुळे लायब्रेरित बसून अभ्यास करायचं प्रमाण वाढलं होतं. निदान दीड तास तरी लायब्रेरित घालवायचाच असा अलिखित नियम बनला होता. याच दरम्यान आमचा क्लासमेट्सचा एक कंपू तयार झाला होता. आणि याच कंपुत भर पडली होती ती एका नव्या मुलीची- मितालीची!
हो- तीच ती गोरी-गोरी पान..!!
तशी मी कोणतीही गोष्ट जर ती- तितकीच महत्त्वाची नसली तर, लक्षात ठेवत नाही. त्यावेळीही मिसने सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरुन गेलो होतो. पण ती विसरली नव्हती.
रात्री तर रात्रीच.
बरोबर आठच्या सुमारास फोनची रिंग वाजली. घरच्यांनी फोन उचलला तर पलिकडून- एका मुलीकडून माझी चौकशी करण्यात आली. आश्चर्य आणि धक्का काय असतं हे एकाच वेळी आमच्या घरच्यांच्या चेहर्यावर दिसून आलं (हे मुलींच्या घरी होतं ना? छे! आमच्याइथची गणितच वेगळी आहेत!)
‘माझ्यासाठी एका मुलीचा फोन- तोही इतक्या रात्रीचा??’ नसत्या शंका कुशंकांनी वातावरण ढवळून निघत असतानाच कोणीतरी मला बेडरुममध्ये फोन आणून दिला.
कॉलेजच्या ग्रॅज्युएशनचे लास्ट इअर. आमच्या क्लासमध्ये दोन-तीन न्यु अॅडमिशन आले. यामध्ये एक मुलगी सुद्धा होती. साधीच होती पण तरीही सगळ्यात उठुन दिसत होती. दुधाळ रंग, साध्या लुज- लो पोनीटेल टाईप मागे बांधलेले काळेभोर दाट- गुळगुळीत केस आणि तेजस्वी चेहर्यावर सतत एक आत्मविश्वासी हास्य! स्वभाव सुद्धा मनमिळावू आणि फ्रेंडली होता तिचा. अगदी ‘परफेक्ट वुमनचीच’ उमपा द्यावी अशी होती ती. तिला पाहताच माझ्या डोक्यात-
‘गोरी गोरी पान! फुलासारखी छाsssन, दाsदा मला एक बायssको आsssण!’ या गाण्याच्या लिरिक्स वाजु लागल्या.
प्रणित,
सर्वप्रथम सॉरी!,
मी तुझी वही दुसर्याच दिवशी परत करणार होते पण नाही जमलं. कारण नेमके त्याच दिवशी रात्रीचे आम्ही सर्वजण मामांकडे गेलो होतो. हा कार्यक्रम अचानक ठरल्याने कोणालाही सांगण्या-बोलण्याची संधीच मला भेटली नाही. शिवाय माझ्या जवळपास कॉलेजच्या कोणीच मैत्रीणी राहत नसल्याने तुझी वही माझ्याकडेच राहून गेली.
मुक्तांगण संशोधनासाठी केसस्टडी म्हणून निवडले आणि दर महिन्याला माधवसरांच्या ठाणे येथिल फॉलोअप ग्रुपला जायला लागलो. डॉ. माधवी साळुंखे यांना सर्वप्रथम तेथेच पाहिल्याचं आठवतंय. त्या दिवशी त्या डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेत होत्या. त्यानंतर दुसर्यावेळी त्या स्वतःच फॉलोअप ग्रुपमध्ये बोलण्यासाठी येणार होत्या. त्यादिवशी बसमधून उतरताना त्यांना अपघात झाला होता आणि हाताला खुप खरचटलं होतं. मिटींगच्या जागीच त्या औषध लावून घेत होत्या. त्या दिवशी कुठल्यातरी देवाचा सण असावा. आपसूकच त्या देवाला लोटांगण घातले गेले असे त्या विनोदाने म्हणाल्या. तेव्हाच त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोणाचे दर्शन घडले होते.