परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते.
आपण कधी खरच विचार केला आहे का आपलं खरं सुख कशात आहे. आपण लहान असताना कोणत्याही गोष्टीत सुख मानत होतो. मग आता असे काय झाले ज्याने सुखाची परीभाषा बदलली.
त्यातलाच एक किस्सा सांगतो.
सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.
पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.
क्रिकेट....फुटबाॅल....ऑलिंपिक....या मोठ्या मोठ्या नावांमधे एक नाव पुसट होत गेले ते म्हणजे कबड्डी. आज अगदी पहिल्या इयत्तेत शिकणार्या मुलाला विचारले 'बाळा तुझा आवडता खेळ कोणता?' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट'!!! अगदी एका जागी बसणारा बाळ असेल तर काही विडिओ गेम्सची पण नावं सांगेल. पण त्याला कबड्डी या खेळाचे नावही माहिती नसेल.
सारांश