लेखनसुविधा

तेवढ्यापुरताच होता मामला

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 April, 2018 - 19:22

ज्या क्षणी तू हात माझा सोडला
जीवनाने पाय मागे ओढला

केवढा उद्विग्न झाला चेहरा
कोणता होता विषय तू काढला ?

ना स्वत:चा, तो तुझा होइल कसा ?
केवढा झाला उशिर समजायला !

एवढ्यासाठीच बहुधा थांबलो
तेवढ्यापुरताच होता मामला

पोखरत काळीज आहे काळजी
सातवा तर जन्म नव्हता आपला ?

एवढ्यासाठीच चालत राहते
परतण्याचा दोर आहे कापला

सुप्रिया

कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2018 - 13:58

पूर्ण रात्रभर एक चांदणी होती जागी
आसपास रेंगाळत होता चन्द्र विरागी !

अर्ध्यावरती बोट सोडले प्रत्येकाने
आश्रयास माझ्या आला एकांत अभागी

उठता-बसता इथे-तिथे काष्ठी-पाषाणी
एक चेहरा खुणवत असतो जागोजागी

अतातरी तू वाग स्वतःच्या मनासारखे
मनासारखे जर त्याच्या अवघे जग वागी

अखंड होतो तेव्हा जो तो निरखत होता
तुकडे झाल्यावर जो तो टाळाया लागी

झिजून गेल्या कातळास हे विचारले मी
काय मिळवले शेवटास तू बनून त्यागी ?

तुझे देवपण तुझी थोरवी मान्य मला, पण...
कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी

सुप्रिया

बदलांना सामोरे जा

Submitted by Pradipbhau on 20 February, 2018 - 11:22

बदलांना सामोरे जा
एकवीसाव्या शतकाकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एका बाजूला डिजिटल क्रांतीची स्वागतार्ह भाषा सर्वत्र केली जात आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक बदलाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 21 व्या शतकातील सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो कौटुंबिक नाती टिकविण्याचा. जीवनात आपणास सर्व काही हवे तसे मिळत नाही. सर्वच अपेक्षांची पूर्तता कधी होत नाही. जे मिळाले आहे ते मनापासून स्वीकारणे. जे मिळाले नाही ते आपल्या नशिबात नाही असे समजून वाटचाल करणे गरजेचे ठरणार आहे. काही प्रसंगी मनाला मुरड घालता आली पाहिजे. आपल्यापेक्षा गरीब

मायबोली सुलभीकरणासाठी काही सूचना

Submitted by शंतनू on 26 December, 2017 - 20:08

माझ्यासारख्या नवख्या लेखकाला मायबोलीवर लेखन करण्यासाठी अतिशय क्लिष्ट अश्या प्रक्रियेतून इक्डून तिकडे उड्या मारल्यावर देखिल 'नवीन लेखन कसे करावे' हे सापडायला खूपच वेळ लागला. मी पूर्वी १-२ लेख लिहिले अस्ल्यामुळे हट्टाने ती सुविधा शोधून काढली (ह्यात काही कर्तृत्व गाजवले असे नसले तरी), नवीन लोक एव्ढे सगळे दुवे वाचत बसतील आणि त्यात लाखो दुवे आणि प्रतिसादांच्या जंजाळातून पाहिजे ती माहिती शोधून काढतील ही अपेक्षा करणे चूक आहे. तरी कृपया खालील सूचनांचा विचार करावा ही विनंती:

लेख - आवडता शब्द 'विषय कट'

Submitted by भागवत on 20 November, 2017 - 01:19

असे म्हणतात दर १२ कोसाला भाषा बदलते. शब्दाचे काय आहे पावसाचे पाणी जसे जमिनीत मुरते तसे शब्द आप-आपल्या भाषेत मुरतात. कधी एखाद्या शब्दाने माणसाला वजन प्राप्त होते तर कोणाच्या बाणेदार बोलण्याने शब्दाला धार चढते. शब्दाची श्रीमंती तुमच्या भारदस्त उच्चारात नसून शब्दाच्या आपलेपणात आहे. एखादा विशिष्ट शब्द एखाद्या माणसाची ओळख सुद्धा होऊ शकते.

शब्दखुणा: 

कथा एका मरणाची

Submitted by कुणी दिवाणा on 30 September, 2017 - 01:20

कलेवर माणुसकीचे, बेवारस पडले होते
देवांवरती दगडांच्या पुष्पघोष सडले होते

ही प्रेते जीवंत सारी, सरणावर आयुष्याच्या
पाहुन स्मशानामधले थडगेही रडले होते

तु दुरुन गेलीस जेव्हा, टाळुन जवळचे नाते
या उरातल्या र्हदयाचे मनसुबे रखडले होते

त्या उनाड वाटासंगे, मी जरा आगळीक केली
ते भले चांगले रस्ते, यावरती अडले होते

एका माझ्या मरणाची, ही कथाच नव्हती वेड्या
हे जगणे कित्येकांना, असेच नडले होते

दौलत

Submitted by कुणी दिवाणा on 29 September, 2017 - 02:24

मी इथे केंव्हाचा ,उभा उतावीळ आहे
त्या तिथे कुणी माझी ,वाट पाहुन गेली

काय तिला इतकाही, विश्वास नसावा आला,
बेताल रात्र ही माझी, स्वप्नें तपासुन गेली

कोरड्याच नयनांनी, ऐकुन घेतले सारे,
उल्लेख तुझा होताना, अश्रु पिसाळुन गेली

ही उदंड दौलत मझी, वादळी स्थिरावत आहे
हा तुझा आवाका नव्हता, तु कुठली लागुन गेली

मी हेच शेवटी माझे गार्हाने मांडत होतो
माझीच माणसे मजला मेल्यावर जाळून गेली

आस

Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2017 - 01:09

आस

चित्ती असो द्यावा येक
बरवा वैकुंठनायक ।।

नाम मुखी वसो सदा
लोपो ऐहिक सर्वदा ।

संतसंगती लाभावी
बुद्धी गोविंदी वसावी ।

हरीरूप व्हावे सारे
नयो मागुते अंधारे ।।

अास हीच जागो चित्ती
दान द्यावे रखुमापती ।।

........................................

आस = इच्छा

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा