भरवसा
भरवसा डोळ्यांवर
भरवसा कानांवर
भरवसा दृढ थोर
माझ्याच तो बुद्धीवर
भरवसा धनावर
भरवसा लोकांवर
भरवसा असे माझ्या
मुला माणसांच्यावर
भरवसा तुटता तो
खंतावतो मनोमन
कोणी नव्हतेच माझे
फुकाचीच वणवण
सारे इथे नाशिवंत
देह जातो चितेवर
भरवसा का धरीला
व्यर्थ उगा अनावर
अाता अाशेने पहातो
दूर कुठे अज्ञातात
भरवसा वाटे जरा
पुन्हा पुन्हा त्या गर्तेत .....
सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.
आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे.
आपण आपल्या मस्तीत जगावं.....
ना कोणाची चिंता ...
ना कोणाची याद ...
आपलाच हा रास्ता...
इथे आपल्यालाच ...आपली साथ..
आपण आपल्या मस्तीत जगावं.....
ह्या होता माझ्या चारोळ्या....."आपण आपल्या मस्तीत जगावं....." ह्या शिर्षकावर ..
तुम्हाला सुचते का कोणती कविता/चारोळ्या....?
पाठवा कंमेंट बॉक्स मध्ये ...."आपण आपल्या मस्तीत जगावं.....".....शीर्षक
जागून उठू दे प्रत्येकातील कवीमन...
सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.
चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.
नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे
मैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.