"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.
घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
नकळत घडली चूक
==============
(कथा काल ऐशीच्या दशकातील).
आम्ही बोकलवाडी सेंट परषु (षु का शू?) माध्यमिक शाळेतील सातवी 'ड' मधली थोर मुलं भुक्कड अशोक सरांना 'पंखा' म्हणतो. त्याची शास्त्रीय कारणे दोन. एक तर शिकवताना टेबला खालून त्यांचे (गुलाबी बेलबोट्म घातलेले) सुकडे पाय कायम समोरच्या बाकाला हवा घातल्या सारखे हलतात आणि दुसरं चित्रकलेच्या देखण्या नयन खेतान बाई. आलं लक्षात? नसेल तर एव्हढच सांगतो त्या काळात खेतानचा पंखा फार पॉपुलर होता. फारच गार गार हवा हो. अतिशय ए वन. असो.
उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो .
आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या .
उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही .
"हा ॲडम समजतो कोण स्वत:ला? " मुलगी शिंग उगारुन घरात शिरली. शाळेतून आली होती.
"कोण ॲडम? "
"अगं इव्ह आणि ॲडम मधला. जगाच्या निर्मितीपासूनच जर असं असेल तर नो वंडर आई, नो वंडर... तमाम बायकांच्या अंतापर्यंत ही चळवळ चालूच राहणार की काय? " मी पाहतच राहिले. ही मुलगी एका क्षणात जगाची सुरुवात, अंत कुठे कुठे जाऊन पोचली होती. वर्षातला एक दिवस तुमच्या नावाने असला की हे असं होतं? तितक्यात ती म्हणाली,
"मला मुळी कळतच नाही इव्ह आणि ॲडम का नाही म्हणत. जिकडे तिकडे मुलगे आधी. तुम्ही सुद्धा घरात मुलगाच आणलात आधी. "
लहानपणापासून मला मासांहारी व्हायचं होतं. कुणी करु नको, खाऊ नको असं सांगितल्यावर ते करावंसं वाटतं ना तसाच तो प्रकार होता. मांसाहार करायचा नाही म्हणजे काय? करणारच. असं मी आईला ठणकावून सांगितलं.
मला एवढ्यात युट्युबवर गंगाधर टिपरे मालिकेचे बरेचसे भाग सापडलेत. मालिका माहिती होतीच. पण आता काही भाग पुन्हा पाहिलेत अन एक नो नॉन्सेस करमणुक मिळाली.
ही मालिका दिलिप प्रभावळकर यांच्या 'अनुदिनी' पुस्तकावर आधारित आहे.
अगदी सर्वसामान्य चौकोनी कुटुंब + आबा.
राजन भिसे - शेखर
शुभांगी गोखले - श्यामल
रेश्मा नाईक - शलाका
विकास कदम - शिर्या (श्रिलेश)
आणि
दिलीप प्रभावळकर - आबा

देवेन वर्मा यांच्या निधनाने अभिनयाच्या वेलीवरचे एक टपोरे द्राक्ष (अंगूर) गळून पडले.
कधीही स्टारडमचे वलय नसलेल्या आणि अतिशय निवडून अभिजात विनोदी भुमिका केलेल्या देवेन यांना सलाम.
लोकमत मधे त्यांच्यावर आलेल्या लेखातला खालील परिच्छेद वाचला आणि या कलाकाराबद्दल आधीच मनात असलेला आदर आणखीनच दुणावला.
रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला. इस्टोरी भन्नाट होती त्याची. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"तो आला होता घरी."
"आता तुझी कैद्यांशी मैत्री? आई, तू लिहितेस हे मान्य पण विषय मिळावेत म्हणून हे असं...."
"पुरे रे. आधी ऐक तर." मी त्याला माळीबुवांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय आहे, सध्या आम्ही वर्षाच्या कराराने कुणी आमचं अंगण हिरवंगार राखेल का याच्या शोधात आहोत. त्यामुळे येऊन जाऊन घरी भावी माळी टपकत असतात.