गझल
" गझल"
तशी ती ही कविता जरासा बदल
जिव्हारी रूते ती म्हणावी गझल..
कुणी शब्द शब्दांत घायाळ होतो
कुणी सांगता शेर होते कतल
कुणी प्रेम विरहात अव्यक्त होता
सुचे जी व्यथा ती म्हणावी गझल..
कधी शायरी केधवा फक्त ओवी
कधी चार ओळीतली दरमजल
जशी पूर्ण होता कळे चित्त आत्मा
उणे वृत्त मात्रा निनावी गझल..
मला काय भावे तिच्या कौतुकाचे
कडू बोल माझे जिथे बेदखल
मिळे दाद जेव्हा मुखाने कुणाच्या
खरी पूर्ण झाली म्हणावी गझल !!
poojaS..
काही म्हणू नका !
काही म्हणू नका !
"हो" ही म्हणू नका, "नाही" म्हणू नका
मौनात राहणे, काही म्हणू नका !
हे तर खरेच की, कोणी न आपले
"ये" ही म्हणू नका, "जा" ही म्ह्णू नका !
सवालास हर एक, ना जवाब असतो
नाही लिहू नका, "कां" ही म्हणू नका !
मुक्काम गाठण्या, मार्ग अपुला ह्वा
भेटेल त्या कुणा, राही म्हणू नका
गरजूस शोधणे, ना सहज राहिले
"उठ" ही म्हणू नका, "खा" ही म्हणू नका !
-अशोक
डॉ अशोक
साग़रसाहेब
साग़रसाहेबांची आणि माझी पहिली भेट ९८-९९ मध्ये कधीतरी झाली. त्या भेटीबद्दल विशेषकाही सांगण्यासारखे नाही. एवढेच जाणवले की हा शायर अतिशय साधा असावा. पुढे अनेक मुशायरांमधे वरवर भेटत राहिलो. एवढे आठवते की भरतनाट्यमंदिरात विनय वाईकर आले होते. अर्थातच साग़रसाहेब पुण्यातल्या उर्दू गझलकारांमध्ये मोठे नाव असल्याने उपस्थित होतेच. साग़रसाहेबांनी स्वतःचा परिचय एक छोटा शायर म्हणून गंमतीत केल्याचे चांगले स्मरते. कार्यक्रमानंतर आम्ही ब-यापैकी गप्पा केल्या. आता नक्की आठवत नाही की त्यांच्या मीरा का दातार दर्ग्यामागील पानाच्या दुकानापर्यंत माझी मजल कशी पोहोचली.
पळपुट्या जखमा किती..
पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!
मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!
लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!
आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!
ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी...
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!
कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..??
सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
अनघड
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
ठसठसणाऱ्या भावना व्यक्त करणाऱ्या नज्म
http://www.youtube.com/watch?v=JqxQrqkSbdI&feature=share
आह्ह ! सुरुवातीलाच घायाळ होतो माणूस असा आवाज, असे संगीत आणि असे शब्द.
जगजीत सिंग यांचा रुहानी आवाज आणि अतिशय सुरेख मनाला भिडणारे असे बोल असणारी हि 'नज्म'
बहोत दिनों कि बात है. फिजा को याद भी नहीं
ये बात आज कि नही बहोत दिनों कि बात है
प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल अशी ती 'बहोत दिनों कि' तरीही आजची आत्ताचीच वाटणारी, मनात ठसून बसलेली 'बात'.... विसरता न विसरता येणारी आणि हट्खोरपणे नको नको म्हणतांना हमखास आठवणारी अशी ती 'बात'
प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी असतंच … नाही ??
सुटका
मला आवडणारी गझल
गझल हा प्रकार हिन्दी तसेच मराठी दोन्ही मध्ये लोकप्रिय झाला आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला एखादी गझल फार म्हणजे फारच आवडून जाते . आपण सतत तीच गझल गुणगुणत असतो . का बरे तीच गझल आवडावी?
येथे आपल्याला आवडणार्या गझल संबंधी लिहिणे अपेक्षीत आहे . शक्यतोवर गझल मधील कठीण अथवा उर्दु शब्दांचे अर्थ दिले तर वाचकांना आनंद वाटेल.
गझल- माणूसकी मनाची तेथून दूर टळते
" माणूसकी मनाची तेथून दूर टळते -"
दु:खात त्यास पाहुन काळीज आत जळते
निर्ढावल्या मनाचा ना काळजास कळते
ती मेनका न येथे ना मी कुणी ऋषीही
भीती मनास माझ्या का नेहमीच छळते
समजावतो मनाला अपुले न येथ कोणी
आशा परी मनाची सगळीकडेच पळते
झाकावयास अंगा घे आवरून पदरा
जाईल तोल माझा मन त्याकडेच वळते
दंगे समोर होता बघती निवांत सारे
माणूसकी मनाची तेथून दूर टळते
.
Pages
![Subscribe to RSS - गझल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)