कबीर
माला फेरत जुग भया
मध्ययुगीन काळात जन्मलेला कबीर आजही या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तो त्याने रचलेल्या दोह्याच्या रूपाने. त्याचे दोहे हे कालातीत आहेत कारण त्यांचा अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला तरीही प्रत्येक वेळी त्यांच्यात नवीन अर्थ दडलेला दिसतो. हे जसे गीतेतला एखाद्या श्लोकाचा उकल करण्याचा प्रयत्न केला तर तो श्रीकृष्णाने गीता सांगितली तेंव्हापासून आताच्या काळापर्यंत त्या त्या काळाला साजेसे अर्थ देऊन जातो, तसेच कबिराचे दोहे, कालमानाप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगून जातात.
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!
कबीर :अवधूता युगन युगन
अवधूता मी तर आहे युगायुगांचा योगी
आल्यागेल्या मिटल्या वाचून शब्द अनाहत भोगी
सारे जगत सगेसोयरे सारे जगत हे जत्रा
सारे माझ्यात मी सर्वात तरीही केवळ एकटा
मी सिध्द समाधी मीच मौनी मी अन मी बोले
रूप स्वरूप अरुपी दावून मीच मजशी खेळे
म्हणे कबीर साधू बंधू रे ऐक नाही कुठली इच्छा
कुटीत माझ्या मीच डोले खेळे सहज स्वेच्छा
अनुवाद विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
रैनि गई मत दिनु भी जाइ
अलीकडेच कबीराची एक सुंदर कविता वाचनात आली.
(Songs of Kabir, Translated by Arvind Krishna Mehrotra, Everyman Publication,
with a preface by Wendy Doniger)
एका महाकवीचे मरणाचे अप्रतिम डिस्क्रीबशन आहे,
डोळे दिपवणारे आहे. कबीर म्हणतो:
रैनि गई मत दिनु भी जाइ
भंवर उडे बग बैठे आइ
थरहर कंपै बाला जिउ
ना जांनौं क्या करिहै पीउ
कांचै करवै रहै न पानी
हंस उडा काया कुम्हिलांनी
कउवा उडत भुजा पिरांनी
कहै कबीर यहु कथा सिरानी
काही अर्थ सांगतो की ज्याने कविता समजायला सोपी जाइल.
एकतर मत इथे सुध्दा अश्या अर्थाने आलेले दिसतेय.
बग म्हणजे हेरोन.
हिरना... समझ-बूझ बन चरना
कुमारांचं निर्गुणी भजन ऐकत होतो.
कुमारांनी ते शब्द इतक्या आर्ततेने आळवलेत की काही केल्या ते शब्द विसरेनात. पण त्याचा अर्थ मात्र तितकासा कळला नाही.
शब्द असे आहेत -
हिरना...
समझ बूझ बन चरना
एक बन चरना
दूजे बन चरना
तीजे बन पग नही धरना
तीजे बन में पाँच पारधी
उन के नजर नही पडना
पाँच हिरना पच्चीस हिरनी
उन में एक चतुर ना
तोए मार तेरे मास विकावे
तेरे खाल का करेंगे बिछोना
कहे कबीरा जो सुन भइ साधो
गुरू के चरन चित धरना
इथून थोडा-फार अर्थ कळला. http://kabir-bani.blogspot.com/2009/10/5-hirana.html
हे हरिणा, या अरण्यात समजून-उमजून चर. अतिशय सावधगिरीने वावर.
![Subscribe to RSS - कबीर](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)