माला फेरत जुग भया
Submitted by स्वेन on 15 January, 2022 - 22:55
मध्ययुगीन काळात जन्मलेला कबीर आजही या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तो त्याने रचलेल्या दोह्याच्या रूपाने. त्याचे दोहे हे कालातीत आहेत कारण त्यांचा अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला तरीही प्रत्येक वेळी त्यांच्यात नवीन अर्थ दडलेला दिसतो. हे जसे गीतेतला एखाद्या श्लोकाचा उकल करण्याचा प्रयत्न केला तर तो श्रीकृष्णाने गीता सांगितली तेंव्हापासून आताच्या काळापर्यंत त्या त्या काळाला साजेसे अर्थ देऊन जातो, तसेच कबिराचे दोहे, कालमानाप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगून जातात.
विषय: