क्रिकेट - ९
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
आमच्या घरात माझे विचार घरातल्या चारचौंघांपेक्षा वेगळे आहेत. तसेच मला ते विचार मांडायला आणि शक्य तिथे आर्ग्युमेंट करायला आवडते. त्यामुळे घरात वादविवाद चर्चा होत राहतात.
-------------------------------
तर या शनिवारची गोष्ट. सुर्याचे पहिले किरण धरतीवर पोहोचायच्या आधीच आम्ही मस्त नहा धो के मॉर्निंग वॉल्कसाठी निघालो. आम्ही म्हणजे मी आणि माझी लेक. हे आमचे दर विकेंडचे रुटीन आहे. पोरांना घेऊन मॉर्निंग वॉकला मिनी सी शोअरला जायचे. तिथून चहा नाश्त्याला जवळच असलेल्या माझ्या सासुरवाडीला आणि पोरांच्या आजोळी फेरी मारून यायचे.
मागील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक सुरूवात झालं, आणि आता पाहता पाहता अंतिम सामना येऊन ठेपला आहे. मागच्या वेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आताही सेमीफायनल सामन्यात हीच न्यूझीलंडची टीम समोर उभी ठाकली होती. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या डावात कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व के एल राहुल या पिचवर उतरलेल्या प्रत्येक बॅटरने आपापल्या निरनिराळ्या शैलीत उत्कृष्ट बॅटिंग करून ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता ; पण न्यूझीलंड बॅटिंगला उतरल्यानंतर मात्र सामन्यात अनिश्चितता निर्माण झाली होती.
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
ड्रीम ईलेव्हन, माय ईलेव्हन, माय सर्कल वगैरे नावांनी जे बेटींग ॲप निघाले आहेत त्याला सरकार कशी परवानही देतेय कल्पना नाही. कदाचित महसूल जास्त मिळत असेल. पण आजूबाजूला दिसणारी तरुण पिढी अक्षरशा या नादाला लागलेली दिसत आहे.
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच..
बर्रं दारूच्या थेट जाहिरातींवर बंदी आहे तसे याच्या जाहीरातींबाबत काही दिसत नाही. उलट क्रिकेटप्रेमींच्या आवडीचे खेळाडूही एकेका ॲपसोबत जोडले गेले आहेत. आणि लोकांना हा जुगार देखील एक खेळ असल्याचे भासवून खेळायला उद्युक्त करत आहेत.
"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..."
१९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन प्रकार आहे इतकेच माहीत होते.
जगभर 2020 मध्ये पसरलेल्या आणि अजूनही चिंताजनक स्थिती असलेल्या ‘कोव्हीड-19’ महासाथीच्या पार्श्वभूमीवर अखेर 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा होत आहेत. या महासाथीमुळे वर्षभर लांबलेल्या या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत अनिश्चितता होती. हो-नाही-हो-नाही या वादावर अखेर पडदा पडला आहे.
भारतात सामाजिक, सरकारी आणि राजकीय पातळीवर ऑलिंपिकबाबत निराशाजनक वातावरण असूनही गेल्या पाच-सहा ऑलिंपिकमध्ये खासगी क्रीडा प्रशिक्षण संस्थामध्ये घडलेल्या आणि पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटत आहे.
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
अपनी गली मै कुत्ता भी शेर होता है" ही म्हण कसोटी क्रिकेटला फारच लागू पडते. पाहुण्या संघाने सिरीज हरायची आणि मग त्यांना आपल्या देशात बोलावून "घरचा आहेर" देण्याची जुनी परंपरा आहे. भारत-ऑस्ट्रलिया पहिला कसोटी सामना ह्याच परंपरेनुसार चालू झाला. ३६ धावांत सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. कोहली बाळंतपणाच्या रजेवर आणि इतर प्रमुख खेळाडू दुखापतीने उपलब्ध नाहीत; असा "दुष्काळात तेरावा महिना" रहाणे पुढे ओढवला. पाहुण्यांना सराव म्हणून राखीव संघ खेळवतात तसला संघ उरला. केवळ पाऊस आला तरच एखादा सामना ड्रॉ होईल अशी शक्यता निर्माण झाली.