सुख-दुःख
आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला
दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते
सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा
दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले
(Dipti Bhagat)
पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे
स्वीकारले जीणे
आहे तैसे दत्ता
जगता जगता
जाय पुढे
दुःखाचे ओझे न
सुखाची काळजी
रित जगण्याची
जाणियली
केवढा हा पसारा
सांभाळसी प्रभू
माझी मात सांगू
काय तुला
घडावे स्मरण
तुझे प्रेम भरी
तेणे उपकारी
सुखीया मी
आणिक ती काही
वांछा मनी नाही
सारे तुझ्या पायी
वाहीयले
असेही एकदा व्हावे..
असेही एकदा व्हावे
स्वप्नांना एक
मुक्त आभाळ मिळावे
असेही एकदा व्हावे
इच्छां-आकांक्षाना
महत्वाकांक्षी होण्याचे बळ मिळावे
असेही एकदा व्हावे माणसांच्या मनातले
गुज न सांगता कळावे
असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे
असेही एकदा व्हावे
सुखाने दुखाःस
आपले जिवलग मानावे
असेही एकदा व्हावे
दुसर्यासाठी जगणे
हे जीवनाचे ध्यास बनावे
असेही एकदा व्हावे
जीवन-मृत्युचे रेषाखंड तोडुन दोन जीव
एक श्वास व्हावे ..
याला जीवन ऐसे नाव!
जगणं म्हणजे जगणं,
जगणं कसं असतं?
मृत्युच्याच दिशेने पुढचं पाऊल नुसतं
मनं म्हणजे मनं,
मनं कसं असतं?
माझं माझं म्हणताना
नेमकं हाती काहीच नसतं
प्रेम म्हणजे प्रेम
प्रेम कसं असतं?
सहवासातही विरहाचं
शल्य मनी वसतं
स्वप्न म्हणजे स्वप्न
स्वप्न कसं असतं?
सत्यसृष्टीत जे उतरत नाही
तेच डोळ्यांना दिसतं
दु:ख म्हणजे दु:ख
दु:ख कसं असतं?
अंत:करणाच्या गाभाऱ्यात
कोपऱ्यात दडून बसतं
याला जीवन ऐसे नाव!
जगणं म्हणजे जगणं,
जगणं कसं असतं?
मृत्युच्याच दिशेने पुढचं पाऊल नुसतं
मनं म्हणजे मनं,
मनं कसं असतं?
माझं माझं म्हणताना
नेमकं हाती काहीच नसतं
प्रेम म्हणजे प्रेम
प्रेम कसं असतं?
सहवासातही विरहाचं
शल्य मनी वसतं
स्वप्न म्हणजे स्वप्न
स्वप्न कसं असतं?
सत्यसृष्टीत जे उतरत नाही
तेच डोळ्यांना दिसतं
दु:ख म्हणजे दु:ख
दु:ख कसं असतं?
अंत:करणाच्या गाभाऱ्यात
कोपऱ्यात दडून बसतं
माझा नोकरीच्या स्थळी जाण्या येण्याचा रोजचा प्रवास कंपनीने करार तत्वावर ठेवलेल्या खाजगी बस मधून होतो.
त्या अनुशंगाने या बस चालवणार्या चालकांशी रोज बातचित होते, माझा स्टॉप शेवटचा असल्याने...
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.
|| ॐ ||
दि. २७ एप्रिल २०१६
ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!