गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत.
भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांना नुकतीच 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने परस्परांमधील मैत्रीपूर्ण संबंधांची आठवण म्हणून 10 जून 2021 रोजी दोन्ही देशांनी प्रत्येकी एका विशेष स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण केले. या निमित्ताने दोन्ही देश संयुक्तपणे 2021-22 मध्ये विविध कार्यक्रमांचेही आयोजन करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये उच्च दर्जाचे संबंध प्रस्थापित झालेले असून भारतात नुकत्याच आलेल्या ‘कोविड-19’च्या दुसऱ्या लाटेच्या काळात बर्लिनने भारताला भरीव मदत केली आहे.
खरं सांग कोण आहेस तु?
निंबोणीच्या झाडामागे खरच लपतोस का तु?
कधी असतोस मामा तर कधी असतेस राणी
खरच का तुझ्यासोबत नाचते समुद्राचे पाणी?
लहानपणी आमच्या ताटात असायचा
तुझ्या नावाचा एक घास
चांदोमामाच्या गावाला जायचा
एकच होता आमचा ध्यास
दर महिन्याला तू
जातोस तरी कुठे?
कुठल्या "ताऱ्यासाठी"
तुझा जीव तीळ-तीळ तुटे?
अजूनही आठवतो का रे तुला
आपला पाठशिवणीचा डाव
वेगळाच होता ना
तो तुझा माझा गाव
शेवटी थकून झोपायचो
मी आईच्या मांडीवर
तू मात्र तसाच जागा
निंबोणीच्या फांदीवर
कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं..
राणी... मुंबईतल्या एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी. पप्पा , मम्मी, दादा आणि ती. एकदम खुश असणार घर. तिच्या पप्पांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. दादात आणि तिच्यात ७ वर्षांचे अंतर.... बहुतेक म्हणून दोघांचे पटत नव्हत... पण राणी मात्र पप्पांची लाडकी.. खूप लाडकी. पप्पा तिचे सगळे लाड पुरवायचे. ती म्हणेल तसा ड्रेस, खाण, फिरायला जाण, वगैरे सगळच....
परदेशातील होणाऱ्या घडामोडी मुळे भारतात देखील त्याचे पडसाद उमटत असतात . या धाग्यावर भारताच्या परराष्ट्र धोरण विषयक चर्चा होईल अशी अपेक्षा !
सुरूवात नेहमी प्रमाणे पाकिस्तान पासून 
पहिले प्रेम, पहिला पगार, पहिला पाऊस, नोकरीचा पहिला दिवस... ह्या आणि अशा अनेक गोष्टी पहिलेपणाच्या न विसरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी असतात कि ज्या आपण कधीतरी पहिल्यांदाच केलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या असतात. आणि तेंव्हा हे पहिल्यांदाच असल्याने आपल्याला त्याविषयी काही माहित नसते त्यामुळे कधी थरार तर कधी गोंधळ अशा गमतीजमती घडत असतात. आणि आता आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा ह्या मजेशीर आठवणी आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. इथे अशाच काही मजेशीर आठवणी आपण शेअर करूया...
नमस्कार. मी मायबोलीवर पूर्वी एकदोनदा मला ज्या समस्या भेडसावत होत्या त्या मी इथे मांडल्या व मायबोलीकरांनी त्यास उपयुक्त प्रतिसाद दिला. त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. हा धागा त्यासंदर्भातच पण पुढच्या पायरीबाबत आहे.
रेप , लैंगिक शोषण , मुलीवर ऍसिड फेकणे हे गुन्हे घडताना आपण पाहत आहोत .... अजूनपर्यंत आपल्या देशात या गुन्ह्यांना कडक शिक्षा नाही . रेपला जास्तीत जास्त 7 वर्षं तुरुंगवास आहे आणि स्त्रीचा मृत्यू झाला तर फाशी ... तेही नक्की नाही .. आपण पाहिलं आहेच गेल्या काही वर्षांच्या घटनांमधून .. त्या डिटेल्स मध्ये पुन्हा जाण्याची गरज नाही ... मग लैंगिक शोषण किंवा ऍसिड हल्ला हे तर जणू अतिशय क्षुल्लक किरकोळ गुन्हे असल्यासारख्या शिक्षा होतात .. एकूण एक सिस्टीम एक भारतीय नागरिक म्हणून अत्यंत निराश करणारी आहे ....