आली ही सर पहिल्या पावसाची,
याच सरींनी घडविली भेट गगन-भूमीची,
भिजवुनी ही काळी माती
सुगंध उधळला आसमंताती,
दोघांच्या या भेटीने सारी सृष्टीच जणू भारली
पुन्हा नव्या चैतन्यात नटन्याची तयारीच करु लागली!
कोसळल्या मग सरींवर सरी
अंगणातला सुगंध गेला नदीच्या तीरी,
घरा घरात बागडू लागल्या मग बायका पोरी,
धांदल उडाली बघ मळेराणावरी
धान्याची झाकाझुक करू लागला शेतकरी,
स्वप्न पाहु लागला तो नव्या पेरणीची
उत्साही सर आली पहिल्या पावसाची.
नशिबी असून काटे जपणे फुलास आहे
छळले कधी फुलाने छळतो सुवास आहे
कळले नसे कुणाला जळते उरात जेही
कळले तरी तसेही पडले कुणास आहे
भलते विचित्र काही करतो विचार मीही
मरणे खुशाल आता जगणे उदास आहे
हळुवार पावसाने भरते विहीर केव्हा
हळुवार पावसाने भरले दुखास आहे
म्हणता जपून खारे रडलो भरून डोळे
घडले बरेच होते मजला उपास आहे
सरला कधी तमाशा सगळे उठून गेले
पटले कधी कुणाला हसणे खुमास आहे
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- अनुराग
(ललगालगालगागा ललगालगालगागा)
कपिल सिब्बल म्हणतात “सगळे घोडे तबेल्यातून पळाल्यावर आमच्या पक्षाला जाग येणार का?”
- पाच मिनिटात तुला कॉल करतो.
- दो मिनिट मे आया च.
- पढके 2-3 दिन मे वापस करता.
- तुम बस हुकूम करो सर.
- तुम्ही निघा मी आलोच.
- मी आत्ता तुझाच विचार करत होतो.
- बस का राव एवढा पण भरोसा नाही का?
असं म्हणणारे सच्चे मित्र तुम्हाला पण आहेत का?
"Special"
"You are overqualified for this job"
5 मिनिटात दोनदा सांगून झालं होत तिचं.. मला हे करायचंच आहे असं निक्षून सांगितलं तेंव्हा कुठं तिनं होकारार्थी मान डोलावली.Offer letter मिळालं .Finally I was "just a Reliever. "
या मुलांसाठी काम करायची ईच्छा बरेच वर्ष मनात होती. कुठेतरी कधीतरी मागितलेलं मिळतंच..नेहाशी कदाचित त्याचमुळ ओळख झाली असावी. हा job मिळण्यामध्ये तिचा मोठा वाटा होता. जेमतेम सहा आठ महिने केला असेल मी पण अजूनही या मुलांची आठवण आली की कासाविस व्हायला होतं .
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
मदर्स डे च्या सगळ्यांना शुभेच्या. त्या निमित्ताने मी आज तुम्हाला माझ्या आईने सांगितलेली गोष्ट सांगणार आहे.
ही गोष्ट फार जुनी आहे. मी फार लहान होते तेव्हा.
त्या काळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची फारच धमाल असायची. आज इकडे तर उद्या दुसरीकडे. कधी कधी तर दिवसात दोन किंवा तीन आमंत्रणं असायचे. माझ्याकडे अनेक गमती जमती आहेत तेव्हाच्या. सांगेन परत केव्हा.
कशा मला ते हसून गेले
उगीच होते छळून गेले
छते जपावी अता मनाची
तडे घराला पडून गेले
चढेल व्हावा जरा तमाशा
तसेच काही रडून गेले
नसेल कारे कुणीच वाली
मढे स्मशाणी सडून गेले
जबाबदारी नको कुणाला
लगेच सारे पळून गेले
स्वप्न उराशी जपून माझ्या
निलेश कारे जळून गेले
निलेश वि. ना शेलोटे
वृत्त :- जलौघवेगा
(लगालगागा लगालगागा)
घरच्या उपयोगा साठी कोणते Fiber ब्रॉडबँड इंटरनेट वापरावे