प्रेमतीर्थ
कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।
भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।
होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।
भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।
देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।
सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....
मिराशी - परंपरागत हक्क
बॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, "ना का मतलब हा होता है" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात "खुद को क्या समझती है" , "खंबे जैसी खडी है" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.
महालक्ष्मी विरुद्ध अंबाबाई....
असे शीर्षक मी कालच्या क्षणापर्यंत वाचले असते तर "भारत विरुद्ध हिंदुस्तान" असे काहीतरी गंमतीने लिहिल्यासारखे वाटले असते.
पण आताच हा लॉंग विकेंड संपता संपता लोकसत्ता चाळत असताना या बातमीवर नजर पडली..
महालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव खोडून ‘अंबाबाई एक्स्प्रेस’, शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन
http://www.loksatta.com/maharashtra-news/mahalaxmi-express-named-ambabai...
मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या.
सगुण ब्रह्म
वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा
भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने
धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत
चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....
आरती घरी आली तरी डोक्यातून विचार जातंच नव्हते.
आल्या आल्या अमितने विचारलंच,"काय गं इतका उशीर झाला आज?".
"अरे ते क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू चालू आहे ना म्हणून. अमु कुठेय?" तिने स्वतःला सावरत विचारलं.
"झोपली ती मघाशी. "
"काय अरे शी. इतका उशीर झाला. सॉरी."
"इट्स ओके. झालंय तिचं नीट जेवण, होमवर्क. चल जेवून घेऊ.", म्हणत त्याने दोघांचं ताट वाढून घेतलं.
तिचं जेवणात लक्षही नव्हतंच. कसंबसं जेवण उरकून तिने पुन्हा लॅपटॉप सुरु केला.
अमितच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पडल्याच.
"इतक्या उशिरा येऊनही अजून काम आहेच?", त्याने विचारलं.
खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.
(अनुभव खरा, नावे खोटी)
त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्याच्या निर्यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.
................................................