सन २०२१च्या मे ते ऑगस्ट या कालावधीत वाचकांना विदेशी साहित्यातील काही गाजलेल्या निवडक कथांचा आणि कथा लेखकांचा परिचय लेखमालेतून करून दिला होता (https://www.maayboli.com/node/79806 ). या लेखातून अशाच एका गाजलेल्या विदेशी दीर्घकथेचा परिचय करून देतो.
शतकापूर्वीच्या त्या कथेपर्यंत जायला काही निमित्त घडले.
भारतीय नौदलासाठी रसद पुरवठा जहाजं (Fleet Support Ship) बांधण्याच्या प्रकल्पाला सरकारने 2016 मध्ये मान्यता दिली होती. आता त्यासंबंधीचा करार संरक्षण मंत्रालय आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात 25 ऑगस्ट 2023 ला करण्यात आला आहे. त्या करारामार्फत भारतीय नौदलासाठी 5 अशी जहाजं स्वदेशातच बांधली जाणार आहेत. हा संपूर्ण व्यवहार 19,000 कोटी रुपयांचा असणार आहे. या जहाजांचे आरेखन आणि बांधणी पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील प्रत्येक जहाजाचं एकूण वजन सुमारे 44,000 टन असणार आहे.
सकाळी अचानक दारावरची बेल वाजली!
यशवर्धन राजे ला आश्चर्य वाटले की एवढ्या
सकाळी कोण भेटायला आले असेल. तो अनिच्छेनेच बऱ्याच वेळाने अंथरुणातून उठला आणि दार उघडल्यावर त्याला उभा असलेला पोस्टमन दृष्टिस पडला. यशवर्धनने रजिस्टरवर सही केली आणि पत्र हातात घेतले. पोस्टमन ने जाताना रागाने बघितले.
यशवर्धन पत्र घेऊन पलंगावर बसला
आणि शिक्क्यावरील गावाचे नाव वाचले, त्याच्या मनात आठवणींचा पूर आला. ते पत्र किरदुर्ग गावातील त्याचा मित्र सुधाकर चे होते आणि नाव वाचल्यावर कॉलेज चे दिवस आणि आज पर्यंतचा भूतकाळ त्याच्या नजरे समोर उभा राहिला.
भय कथा हा सर्वांचा आवडीचा विषय!
तशी भय कथा सर्वानाच वाचायला आवडते!
आज च्या काळात तर इंटरनेट मूळे लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचण्याची तसदी घ्यायची आवश्यकता राहिली नाही
मी नवीनच कथा लेखन सुरू केले आहे! आवडीचा विषय भय कथा!
ही माझी पाहीलीच कथा किरदूर्ग च्या लिखाणाला मी सुरुवात केली आहे!
ही कथा आहे एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या गावाची! अतृप्त शक्ती च्या प्रादुर्भावा मूळे, संपन्न गावाच्या होत असलेल्या वाताहतीची!
तसेच
लहान पनीच अध्यात्माशी जोडल्या गेलेल्या एका योध्याच्या सोनेरी आयुष्याची ही सुरुवात आहे!
आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.
आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.
आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.
आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं
"बाबा...! बाबा...अहो उठा ना...बघा किती वाजलेत? आज तुम्ही मला बागेत जायचं म्हणून प्रॉमिस केलेलं ना..? मग उठा ना." लहानशी चिऊ तिच्या झोपलेल्या बाबांना उठवत होती.
"चिऊ, उठ बरं तिथून बाबांना त्रास नको देऊ, ते काल रात्री उशिरा दमून आलेत झोपू दे त्यांना. चल बरं पटकन,मी तुला अंघोळ घालते."
वैदही आपले केस पुसत म्हणाली.
"नाही... मी नाही येणार, अगं मला बाबांनी काल प्रॉमिस केलंय..." "काय चाललंय सकाळी सकाळी तुम्हा दोघींचं?"
वैदही काही बोलणार इतक्यात शिव डोळे चोळत उठून बसला.
"Good Morning बाबा..." चिऊ पटकन शिव च्या मिठीत शिरली.
"मन सुद्ध तुझं गोस्त हाये...."
संध्याकाळचे साडे सहा वाजले असतील... निकिता ऑफिस मधून निघाली. नवीन जॉब, त्यात नवीन लोकं, नवीन मित्र मैत्रिणी, सगळं स्ट्रेसफूल होतं. सहाजिक आहे- निकिता सारख्या लाजऱ्या बुजऱ्या मुलीसाठी कोणतीही नवीन गोष्ट म्हणजे मोठं चॅलेंज! ऑफिस घरापासनं बऱ्यापैकी लांब होतं. थोडंसं चालून मग शेअर रिक्षाने ती घरी जात असे. आज ती भराभर पावलं टाकत आपल्याच तंद्रीत चालत होती. आकाशात मस्त रंगांची उधळण चालली होती. गुलाबी निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग सुंदर दिसत होते. फोटो काढायचा मोह काही तिला आवरला नाही.