नागदर्शने!!
कोकणामधे राहिल्यावर सर्वात जास्त सवय कशाची झाली असेल तर ती जनावराची. महिन्याभरात तरी कुणाकडे जनावर निघालं, मग ते जातिवंत होतं का, त्याला कसं पकडलं वगैरे चटपटीत गॉसिप ऐकलं नाही असं होतंच नाही.
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे त्याचे बाहेर पडायचे दिवस. नेहमीचं दमट हवामान त्याला मिळालं नाही की तो स्वतःच शोधत निघतो, मग कुणाच्या कपाटात, संडासात, मोरीत, बेसिनमधे आलेला दिसला, की समोरच्याची हबेलहंडी उडालीच.