गुलाम अली
गुलाम अली या नावाने सुरु केलेल्या धाग्याला प्रस्तावनेची गरजच नाही. :-)
गुलाम अली यांनी गायलेल्या गझला आणि त्याचा संग्रह माबो वर सापडला नाही. सगळ्या गझला आणि त्यांच्या लिंक एका जागी असल्यास शोधायला आणि ऐकायला बरे पडते. शिवाय आपल्याला कधी कधी त्यांच्या सर्वच गझला माहित नसतात, त्या माहित व्हाव्या म्हणून हा धागा.
माझी गुलाम अली प्लेलिस्ट :-
१. चुपके चुपके
२. आवारगी
३. हम को किस के गम ने मारा
४. दिलमें ईक लहर सी उठी है अभी
५. अपनी धुन में रहता हूँ
६. रास्ते याद नहीं
७. हम तेरे शहर में आए है
८. इतनी मुद्दत बाद मिले हो
नवीन चित्रपटांमधील गाण्यांवर ज्येष्ठ नागरिकांकडून कायम एकांगी टीका होत असते. अश्लीलता, कर्कश्यपणा, तंग आणि छोटे कपडे, ना सूर, ना ताल, असे अनेक आरोप या गाण्यांवर करून जुनी पिढी स्वतःच्याच काळातील गाणी कशी भारी याचा गोबेल्स पद्धतीने प्रचार करत फिरत असते. मुळात ते फक्त पॅकेजिंग वर भुलून कंटेंटकडे दुर्लक्ष करत असतात हि खरी समस्या आहे. आमची पिढी जास्त संस्कारी आणि नम्र असल्याने आम्ही जेष्ठ नागरिकांशी कधीही प्रतिवाद करत नाही. पण हे असे किती दिवस चालणार? त्यांना त्यांच्या या गैरसमजुतीतून बाहेर काढणे हि गरज आहे. आमची नाही त्यांची !
कामाठीपुरयाच्या ११व्या गल्लीत अरुंद बोळांच्या आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत उभी आहे 'आशियाना' ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडीत आहेत. आजही 'आशियाना' हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल असं वाटते. 'बच्चुची वाडी' पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे 'आशियाना'. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात.
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप नाटक करणार आहे. महाभारतावर ! अन मी दु:शासन !
फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी पुरूषोत्तमच्यावेळी आणि नुकतेच फिरोदिया मध्ये केले होते. यण्दा हा मान चक्क कान्सने पटकावला आहे. पण एक गोची आहे.
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.
'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...
हा अभंग ज्या कोणी संत श्री अमृतराय यांनी लिहिलाय त्यांना ते ब्रह्म दृग्गोचर झाले असेलही - कल्पना नाही.. पण आपल्याला स्वरब्रह्म नक्कीच भेटवेल असे हे अद्वितीय गाणे...
लहानपणी कानावर पडलेले या गाण्याचे सूर .... जसजसा मोठ होत गेलो तसतशी या सुरांची मोहिनी अजूनच गडद होत गेली.
खळे काकांनी जयजयवंती रागात बांधलेला हा श्री अमृतराय या संतांचा हा एक अगदी गोऽड अभंग. आशाबाईंनी अशा ताकदीने गायलाय की कितीही वेळा ऐकला तरी त्यातली गोडी उणावतच नाही, उलट वाढतच जाते...
दरवर्षी वारीला जाणार्या वारकर्याला जसे
"पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन विठोबाचे"
यातच स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो त्याचप्रमाणे पंचममॅजिकची वारी आम्हा पंचमप्रेमींकरता स्वरांची पंढरी आहे.
पुढे लिहीण्यापूर्वी या आधी पंचम मॅजीक संस्थेविषयी मी थोडे लिहीले होते तेही इथे बघता येईल. http://www.maayboli.com/node/11300
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
मंडळी आपण मंगलाष्टक वन्स मोर मधील नवरीनी नवऱ्याची स्वारी हे गाणे ऐकलेच असेल.
तर त्या गाण्यात २ मी ८ व्या सेकंदापासून ते १४ व्या सेकंदापर्यंत एक धून वाजते.
तर माझा प्रश्न असा आहे की ही धून कोणत्या गाण्याची आहे?
माबोकरांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत!
गाण्याची लिंक - https://m.youtube.com/watch?v=29uNb3_OqVQ
२०१४ च्या फँड्रीनंतर 'त्या' एकाच गाण्यासाठी साठी धागा काढावा म्हणता म्हणता सैराट ऊजाडला आणि अजय -अतुल फॅन क्ल्ब जमवणे नेसेसिटीच झाली.
https://www.youtube.com/watch?v=O_R0Sx6bggI
खरं तर अजय- अतुल फॅन क्लब काढण्यासाठी फँड्रीतली ऊरूस स्टाईल म्युझिक कंपोझिशन, नटरंग मधला गण किंवा जीव रंगला, किंवा मोरया सुद्धा असं एखादंच गाणं पुरेसं आहे. चित्रपटांची जंत्रीच्या जंत्री देण्याची काही गरजंच नाही, पण तरी फॅन म्हंटलं की ऊदो ऊदो करणं हक्कंच आहे आमचा.
अगं बाई अरेच्याचं एकंदर मुझिक पॅकेज मस्तं होतं.मला कोंबडी वगैरे सारखी गाणी फार अपील झाली नाहीत पण नटरंग च्या गाण्यांनी पुन्हा वेड लावलं.