१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.
ट्रेकर्सलोकांची पंढरी म्हणुन प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड अनेक संधी मिळुनसुद्धा पहायचा राहिला होता.. पण अचानक माझ्या आवडत्या "ट्रेक मेटस" ग्रुप बरोबर जाण्याची संधी मिळाली.. ती सुद्धा "हरिश्चंद्र व्हाया नळीची वाट" या मार्गे !!!
हरिश्चंद्रगडावर जाण्यास असलेल्या अनेक वाटांपैंकी दोन नंबरची ही अवघड वाट.. एक नंबरवर अर्थातच कोकणकडाची वाट आहे !!
सहावा दिवसः पुष्कर, रणथम्भोर

तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार
चितौडचा इतिहास
इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी नाण्यांवर आढळणार्या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी उदयपूरला हलवण्यात आली.
सोमवार, गुरुनानक जयंतीची सुट्टी नि त्रिपुरी पौर्णिमा असा चांगला योग जुळून आला नि नेहमीप्रमाणे आदल्या रात्री अचानक "त्र्यंबकेश्वर - ब्रम्हगिरी- हरिहर ट्रेक" करण्याचे ठरले ! मी नि ऑफिसमधील माझे तीन मित्र असे चार जण तयार झाले नि रविवारी रात्री नाशिक गाठले !