माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
"विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्याने मी जाहीर केलं.
"कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं.
"त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा विनोद झाल्यासारखा खो खो हसला.
"बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"
"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची..
गजाननाची आरती चालू होती. पुण्यात आल्यापासून दररोज मी गजाननाची आरती करत असे व त्यांनतर माझं दिवसाच कामकाज सुरू होई."
'तसंही मला जास्त काम नसे. श्वेता टेक्नॉलॉजीे फक्त मोठ्या बिजनेसलाच टेक्नॉलॉजी पुरवत असे आणि त्यामुळे काम कमी आणि पैसा जास्त असं सूत्र होतं. तसही काही असेल तरी आमची २४ जणींची टीम आपापल्या क्षेत्रात पूर्णपणे पारंगत होती. जरी मी एम डी असले तरीही आमच्यात सलोख्याचे संबंध होते."
"आमचा नफा खूप जास्त होता. पण आम्ही त्यातील फक्त १० टक्के भाग ठेवत असू आणि बाकी सर्व विधवा परितक्त्या महिलांसाठी दान करत असू."
पूर्वी कसं होतं नं कि महात्मा गांधी, वीर सावरकर, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद यांसारखे थोर विचारवंत, ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे संत होते... त्यांनी लिहायचं, आपण जमेल तेवढं झेपेल तेवढं वाचायचं... आणि वाचल्यावर त्यांच्या चरणांचं फक्त तीर्थच प्यावं अशी केवळ आशा बाळगायची...
भाग १ -
http://www.maayboli.com/node/62798
भाग १ पासून पुढे -
..................................................................
बसा मि. सागर..
डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना?
काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे...
आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल..
हो डॉक्टर..
गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा..
.....................................................
अहो ऐकलत का?..
तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे...
कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?..
अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही..
विसरला का तुम्ही?
आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी..
अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो..
..........................................................
- २० मिनिटानंतर...
(गाडीमध्ये सागर व त्याची बायको..)
सागर.. तुम्हाला काही विचारु का?
"व्यंकतरमन्ना गोविंदा!!"
"अरे काय कोलाहल माजवलाय नुसता. मूर्ख कुठले. तो देव अशाने कान बंद करून घेईल. आणि त्यांना काय मूर्ख म्हणतोय, स्वतःकडे बघ." मी मनाशीच म्हणालो.
"जगात सगळे लोक वेगवेगळे का बनवले?"
" ...कारण या जगात सर्व रंग असावेत म्हणून. कुणी चांगला, कुणी वाईट, कुणी हुशार, कुणी अडाणी, कुणी दयाळू तर कुणी खूप कठोर...."
"...मग सगळ्यांचीच अशी अपेक्षा का की मी माझ्या वडिलांसारखं असावं? असतील ते जगातील सर्वात चांगले व्यक्ती, पण ज्या व्यक्तीला मी कधी बघितलही नाही म्हणून मी फक्त हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो म्हणून त्यांच्यासारख वागावं?"
नमस्कार,
माझ्या मुलीला A २ जर्मन भाषेतली परीक्षा द्यायची आहे.त्यासाठी तिला मुंबईमध्ये tuition / मागदर्शन हवे आहे.कोणी मदत करू शकेल का ?
तिने मुंबई विश्वविद्यालयाच्या दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे.परिक्षा जूनमध्ये आहे.
ll जय भद्रकाली ll
भद्रावती नगरीत युद्धाची तयारी सुरू आहे. राजाचं शयनगृह म्हणजे युद्धनियोजन बैठकींचं मुख्य ठिकाण. एकदा राजा एकटाच युद्धविषयक विचारमंथन करत असतांना सेवक बोलवायला येतो आणि राजाला घाईघाईत जावं लागतं.
राजा परत येतो तेव्हा सोनेरी नक्षीकाम केलेला नकाशा गायब झालेला असतो.
ही झाली प्रमुख घटना. यावर आधारीत मी दोन प्रश्न विचारणार आहे. पहिल्याचं उत्तर आधी शोधायचंय. ते मिळालं की नंतर मी दुसरा प्रश्न विचारेन.
पहिला प्रश्न :
नकाशा कुणी पळवला आणि कसा ?
आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...
व्हॅल्यु अॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे