ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण
२०१२ च्या उपक्रमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेखः http://diwali.upakram.org/node/191
ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण
'मराठीमध्ये काही राम राहिलेला नाही' असे बरेचदा ऐकायला मिळते. मराठीचा प्रसार व्हायला हवा, मराठी जिवंत रहायला हवी वगैरे पण. हा जीव वेगवेगळे लोक मराठीत वेगवेगळ्या प्रकारे ओतू पाहतात. मराठी बाण्याची गरज का आहे, याबद्दल मतभेद आहेत. पण ती गरज आहे यावर मराठी न वापरणार्या लोकांचे सोडून इतरांचे एकमत आहे. आमच्या मते, मराठीकडे होतकरूंना आकर्षित करण्याकरता कसरती वापरायला हव्या (अर्थात शाब्दिक). शब्दखेळच नव्हे तर आवश्यकता भासल्यास (आणि ती आहेच) शब्दच्छलही योजावा.